Mohammed Shami : मोहम्मद शमी टीम इंडियात पुनरागमनासाठी सज्ज

बडोदा : टीम इंडियातील कमबॅक करण्यासंदर्भातील सस्पेन्स कायम असताना भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं थेट विजय हजारे ट्रॉफी मैदानातील कामगिरीनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.मोहम्मद शमीने आपला उत्कृष्ट फॉर्म सुरू ठेवत गुरुवारी विजय हजारे ट्रॉफीच्या बाद फेरीत हरियाणा विरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीनं दमदार कामगिरी केली.





बंगाल आणि हरयाणा यांच्यातील प्री क्वाटर फायनलची लढत बडोदा येथील मोतीबाग स्टेडिमवर रंगली आहे.या सामन्यात शमीनं बंगाल संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तंदुरुस्त असल्याचे संकेत बीसीसीआय निवडकर्त्यांना दिले आहेत. मोहम्मद शमीनं १० षटकांच्या कोट्यात ६१ धावा खर्च करताना संघाकडून सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याचा पहिला बळी हिमांशू राणा हा सहाव्या षटकात यष्टिरक्षक अभिषेक पोरेलने झेलबाद झाला. शमीने त्याच्या पहिल्या स्पेलच्या उरलेल्या षटकांमध्ये ६.६७ च्या इकॉनॉमी रेटने ४० धावा दिल्या. ४२ व्या षटकात त्याने दिनेश बानाला बाद करताना आपली दुसरी विकेट घेतली. शमीने लवकरच अंशुल कंबोजला पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि सामन्यातील आपली तिसरी विकेट घेतली. या सामन्यात डावाच्या सुरुवातीला सलामीवीर अर्श रंगाने शमीच्या चेंडूंवर दोन षटकार ठोकले होते.



वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत दुखापतीसह खेळला अन् वर्षभरापेक्षा अधिक काळ क्रिकेटपासून दूर राहिला. वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत शमी दुखापतीसह खेळला होता. याचा त्याला मोठा फटका बसला. वर्षभरापेक्षा अधिक काळ क्रिकेटपासून दूर राहण्याची वेळ त्याच्यावर आली.आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी लवकर बीसीसीआय निवडकर्त्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीआधी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील सामन्यात १० ओव्हरच्या कोटा पूर्ण करून पुन्हा एकदा टीम इंडियात कमबॅकसाठी तयार असल्याचे संकेत मोहम्मद शमीनं दिले आहेत. अशा परिस्थितीत शमी वर्षभरानंतर राष्ट्रीय संघात पुनरागमन करेल अशी पूर्ण आशा आहे. बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धेच्या मध्यभागी तो पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती, परंतु त्याला रिकव्हरीदरम्यान समस्या आल्या, त्यामुळे टीम इंडियातील त्याचे पुनरागमन लांबणीवर पडले.

Comments
Add Comment

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी