Crime: ऑफिसच्या पार्किंगमध्ये महिला कर्मचाऱ्यावर हल्ला, उधारीच्या वादातून सहकाऱ्याने घेतला जीव

पुणे: महाराष्ट्राच्या पुण्यातील एका बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग कंपनीत काम करणाऱ्या २८ वर्षीय महिलेवर मंगळवारी संध्याकाळी तिच्या सहकाऱ्याने धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार येरवडा स्थित एका कंपनीच्या पार्किंगच्या ठिकाणी ही घटना घडली.


मृत महिलेची ओळख शुभदा कोदारी अशी झाली आहे तर आरोपीचे नाव कृष्णा कनोजा होते. हा आरोपी फर्ममील अकाऊंट सेक्शनमध्ये काम करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक माहितीनुसार कंपनीच्या पार्किंगमध्ये संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास संशयिताने धारदार शस्त्राने महिलेवर हल्ला केला. हा हल्ला उधारीच्या पैशावरून झालेल्या वादातून करण्यात आला.


महिलेचे खूप रक्त वाहत होते. तिला तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आरोपी कनोजाला ताब्यात घेण्यात आले आणि मृत महिलेच्या बहिणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


उधारीच्या पैशाच्या वादातून हत्या झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहे. गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात हैराण करणारी बातमी समोर आली होती. येथे चकेरीच्या अहिरवांमध्ये पान दुकानदाराची हत्या करण्यात आली. सिगरेट घेण्यासाठी पोहोचलेल्या आरोपीकडे दुकानादाराने आधीची उधारी मागितली. यामुळे तो आरोपी चिडला आणि त्यानंतर दुकानदाराच्या गळ्यावर काचेच्या तुकड्याने हल्ला केला. मात्र उपचारादरम्यान या दुकानदाराचा मृत्यू झाला.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे