Rajagopala Chidambaram : अणुशास्त्रज्ञ आर. चिदंबरम यांचे निधन!

मुंबई : देशातील ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ राजगोपाल चिदंबरम (Rajagopala Chidambaram) यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ८८ वर्षांचे होते. चिदंबरम यांनी पहाटे ३ वाजून २० मिनिटांच्या सुमारास मुंबईच्या जसलोक रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम केले. चिदंबरम यांना १९७५ आणि १९९९ मध्ये पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.



गेल्या काही दिवसांपासून चिदंबरम यांची प्रकृती ठीक नव्हती. शास्त्रज्ञ म्हणून डॉ. चिदंबरम यांनी भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक, अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव म्हणून काम केले होते. तसेच १९९४-९५ दरम्यान आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या संचालक मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. डॉ. चिदंबरम हे भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागारही होते. डॉ. चिदंबरम यांनी भारताच्या अण्वस्त्र कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली – पोखरण-I (१९७५) आणि पोखरण-२ (१९९८) च्या चाचणी तयारीचे आयोजन.

अणुऊर्जेच्या शांततापूर्ण वापराचे समर्थक, त्यांनी भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचे नेतृत्व केले. डॉ. चिदंबरम यांना पद्मश्री (१९७५) आणि पद्मविभूषण (१९९९) यांच्यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

वरिष्ठांनी भाजपसोबत जायचे ठरवल्यास दुसरा पर्याय निवडेन!

आ. रोहित पवार यांचा दावा; आजोबा आणि आत्याला दिला इशारा मुंबई : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय

एकनाथ शिंदेंकडून २०२९ साठी स्वबळाची चाचपणी?

२०० मतदारसंघात संघटनात्मक बांधणी सुरू; मंत्री उदय सामंत आणि श्रीकांत शिंदेंवर सोपवली मोठी जबाबदारी मुंबई :

EL Nino effects to Kharif : यंदाच्या खरीप हंगामावर ‘एल-निनो’चे सावट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

- पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला फटका बसण्याची शक्यता मुंबई : यंदाच्या खरीप हंगामावर ‘एल-निनो’चे

मुंबईत ‘सायप्रस ट्रेड सेंटर’ उभारणार

राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांची घोषणा; बिझनेस फोरममध्ये भारत-सायप्रस दरम्यान सहा सामंजस्य

Mangrove Park in Gorai : गोराईत राज्याच्या पहिल्या 'कांदळवन पार्क'चे २८ मे रोजी उद्घाटन; निसर्गप्रेमींना मिळणार विरंगुळ्याचे नवे ठिकाण

मुंबई : अनेक दिवसांच्या आणि वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुंबईकरांना निसर्गाच्या सान्निध्यात विरंगुळा

कौशल्य विकासासाठी महाराष्ट्र आणि दक्षिण कोरियामध्ये करार

राज्यातील युवकांना मिळणार जागतिक दर्जाच्या संधी; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या मुंबई :