Kasara RPF : 'मरे'च्या आरपीएफ टीमने वाचवले व्यक्तीचे प्राण

मुंबई :  कसारा येथील मध्य रेल्वेच्या आरपीएफ टीमने एका व्यक्तीचे प्राण वाचवण्यात, अतुलनीय टीमवर्क, समर्पण आणि माणुसकी दाखवून महत्त्वाची भूमिका बजावली. कसारा येथील आरपीएफ पोस्टला अंकित गर्ग, वरिष्ठ विभाग अभियंता/पर्मनंट वे यांच्याकडून रेल्वे रुळांच्या बाजूने ११०/४२ या पोल क्रमांकाजवळ कोणीतरी पडल्याचा संदेश प्राप्त झाला.

आरपीएफचे उपनिरीक्षक राम लखन कुमार त्यांच्या टीमसह तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. टीमने त्वरीत कारवाई करून त्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात नेले जेथे त्याला पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, त्याच्या बॅगेची नियमित तपासणी केली असता त्या व्यक्तीचे नाव सोमनाथ एकनाथ शिंदे, इगतपुरी येथील रहिवासी आणि भांडुप युनिट क्रमांक १, ट्रॅक मेंटेनर म्हणून कार्यरत असलेले रेल्वे कर्मचारी असल्याचे उघड झाले.




शिंदे यांनी तपास पथकाला माहिती दिली की, तो ड्युटीवरून घरी परतत असताना उंबरमाळी येथे उतरला होता आणि महामार्गावर उभा असताना त्याला अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण करून लुटले, त्यानंतर त्यांनी त्याला रेल्वे रुळालगतच्या खांबाजवळ फेकून दिले. वैद्यकीय चाचण्यांमध्ये त्याला अंतर्गत जखमा आढळून आल्या आणि त्यानुसार त्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. उपनिरीक्षक राम लखन कुमार, हेड कॉन्स्टेबल संतोष बागुल आणि अधिकृत वाहन चालक महिपाल पंडित यांचा समावेश असलेल्या RPF च्या टीमने एकाचा जीव वाचवण्याचे कौतुकास्पद काम केले आहे. आरपीएफ टीम “जीवन रक्षक” या बिरुदावलीस पात्र ठरली आहे.

Comments
Add Comment

वरिष्ठांनी भाजपसोबत जायचे ठरवल्यास दुसरा पर्याय निवडेन!

आ. रोहित पवार यांचा दावा; आजोबा आणि आत्याला दिला इशारा मुंबई : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय

एकनाथ शिंदेंकडून २०२९ साठी स्वबळाची चाचपणी?

२०० मतदारसंघात संघटनात्मक बांधणी सुरू; मंत्री उदय सामंत आणि श्रीकांत शिंदेंवर सोपवली मोठी जबाबदारी मुंबई :

EL Nino effects to Kharif : यंदाच्या खरीप हंगामावर ‘एल-निनो’चे सावट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

- पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला फटका बसण्याची शक्यता मुंबई : यंदाच्या खरीप हंगामावर ‘एल-निनो’चे

मुंबईत ‘सायप्रस ट्रेड सेंटर’ उभारणार

राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांची घोषणा; बिझनेस फोरममध्ये भारत-सायप्रस दरम्यान सहा सामंजस्य

Mangrove Park in Gorai : गोराईत राज्याच्या पहिल्या 'कांदळवन पार्क'चे २८ मे रोजी उद्घाटन; निसर्गप्रेमींना मिळणार विरंगुळ्याचे नवे ठिकाण

मुंबई : अनेक दिवसांच्या आणि वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुंबईकरांना निसर्गाच्या सान्निध्यात विरंगुळा

कौशल्य विकासासाठी महाराष्ट्र आणि दक्षिण कोरियामध्ये करार

राज्यातील युवकांना मिळणार जागतिक दर्जाच्या संधी; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या मुंबई :