नववर्षातील धक्कादायक घटना, क्षुल्लक वादातून आई-बहि‍णींना यमसदनी धाडले

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील लखनऊमधून नव्या वर्षाच्या सुरुवातीला एक धक्कादायक वृत्त आले आहे. लखनऊमधील एका हॉटेलमध्ये पाच जणांची हत्या करण्यात आली. मृतांमध्ये चार मुली आणि त्यांच्या आईचा समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणात संशयित आरोपी मुलाला अटक केली आहे. मुलावर आई आणि चार बहि‍णींच्या हत्येचा आरोप आहे. संशयित आरोपी मुलाचे नाव अर्शद असे आहे. तो २४ वर्षांचा आहे. क्षुल्लक कौटुंबिक वादातून अर्शदने हे धक्कादायक कृत्य केल्याचे प्राथमिक चौकशीतून निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. क्षुल्लक वादातून अर्शदने धारदार ब्लेडने पाच जणांची हत्या केली. अर्शदचे वडील बदर हे फरार आहेत. पोलीस त्यांना शोधत आहेत.





अर्शद त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह इस्लाम नगर, तेधी बगिया, कुबेरपूर, आग्रा येथे वास्तव्यास होता. तो लखनऊ येथील हॉटेलमध्ये घरच्यांसह का आला ? घरातील सदस्यांच्या हत्येमागचे नेमके कारण ? अर्शदच्या वडिलांच्या फरार होण्यामागचे कारण ? आणि अर्शदचे वडील कुठे आहेत ? ते समोर येणे का टाळत आहेत ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे.





पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनऊमधील नाका परिसरातील हॉटेल शरणजीतमध्ये अर्शदची आई अस्मा तसेच अर्शदच्या बहिणी आलिया (९), अलशिया (१९), अक्सा (१६) आणि रहमीन (१८) यांचे मृतदेह आढळले. सर्वांची धारदार ब्लेडने हत्या करण्यात आली आहे. या प्रकारामागे गैरसमज किंवा अंधश्रद्धा अथवा कौटुंबिक प्रतिष्ठा जपण्याची धडपड असे नेमके कोणते कारण आहे हे जाणून घेण्यासाठी तपास अद्याप सुरू आहे. अर्शदचे वडील बदर यांचाही शोध सुरू आहे. न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याआधी सर्व शक्यतांचा सखोल तपास करणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
Comments
Add Comment

Chief Minister of Keral : अखेर सस्पेन्स संपला ! केरळमचे मुख्यमंत्री ठरले

Chief Minister of Keral : केरळमधील मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स अखेर संपला असून, काँग्रेसने (Congress ) व्ही. डी. सतीशन यांच्या नावाची

Delhi Bus Rape Case : दिल्ली हादरली! स्लीपर बसमध्ये विवाहित महिलेवर बलात्कार

दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चेत आली आहे. राजधानीत एका खासगी

Price Hike : सामान्यांच्या खिशाला कात्री; सोनं-चांदी ते दूधाच्या दरात मोठी वाढ

नवी दिल्ली : गेल्या चार दिवसांत देशाच्या आर्थिक आणि वित्तीय क्षेत्रात झपाट्याने घडामोडी घडताना दिसत आहेत.

Maharashtra ATS Launches Massive Crackdown : ATS चा धडाका! पाकिस्तानस्थित 'भट्टी गँग'चे जाळे उखडून फेकले; महाराष्ट्रात ४० ठिकाणी छापे, ५७ जण ताब्यात

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) बुधवारी पहाटेच्या सुमारास संपूर्ण राज्यात एक मोठी शोधमोहीम राबवली.

Uttar Pradesh Storm : उत्तर प्रदेशात निसर्गाचं तांडव! वादळ, मुसळधार पाऊस आणि वीज कोसळून ५६ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) विविध जिल्ह्यांना बुधवारी भीषण वादळ आणि मुसळधार पावसाने झोडपून काढले. या

Monsoon Rain Update : उकाड्यापासून लवकरच सुटका! अंदमानात पुढच्या ४८ तासांत पावसाच्या सरी कोसळणार!

देशभरात उन्हाचा चटका वाढत असतानाच भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) एक दिलासादायक बातमी दिली आहे. नैऋत्य