Durgadi To Titwala Train : कल्याणवासीयांसाठी खुशखबर! दुर्गाडी ते टिटवाळा आता २० मिनिटात

ठाणे : वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता वाहतूक कोंडी कमी करण्यासह प्रवाशांचा प्रवास आरामदायी करण्यासाठी शहरातील कमी वेळेत जोडणाऱ्या रिंग रोडच्या दुर्गाडी ते टिटवाळा मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. हा रस्ता मार्चअखेरीस वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. या रस्त्यामुळे कल्याण ते टिटवाळा अंतर विनाअडथळा २० मिनिटांत गाठणे शक्य होणार आहे.



कल्याण, डोंबिवलीच्या बाहेरच्या बाजूने जोडणारा रिंग रोड ८ टप्प्यात २०१३ मध्ये प्रस्तावित केला होता. त्याला २०१७ या वर्षात मान्यता मिळाली. अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन, घरे, उत्पन्न देणारी झाडे आदी बाधीत होत असल्याने त्याचा रोख मोबदला मिळावा, ही मागणी करत जागा देण्यास रहिवाशांनी विरोध केला. तरीही प्रशासनाकडून दुर्गाडी ते टिटवाळा या रस्त्याच्या क्र. ४ ते ७ या टप्प्यातील कामाला सुरुवात करण्यात आली. आता या रस्त्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.

या कामात आधारवाडी डम्पिंगचा मोठा अडथळा होता. MMRDA ने डम्पिंग हटवले जात नाही तोपर्यंत रस्ता पूर्ण होऊ शकणार नसल्याचा अभिप्राय दिला होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून डम्पिंगवर कचरा टाकणे बंद करत येथे बायोमायनिंग पद्धतीने डम्पिंग बंद करण्याचा प्रस्ताव सादर केला.
Comments
Add Comment

Kurti Designs : फॅशनप्रेमींसाठी खास! 'या' कुर्ती डिझाइन्स ज्या कधीच आउट ऑफ ट्रेंड होत नाहीत

अनारकली (Anarkali) कुर्ती https://prahaar.in/2026/07/27/eating-honey-daily-offers-these-amazing-health-benefits-find-out-what-the-experts-say/ पारंपरिक आणि एलिगंट लुकसाठी नेहमीच बेस्ट

Jeans Styling : स्टायलिश लूक साठी ; जीन्सची खरेदी करताना हा महत्त्वाचा सल्ला लक्षात ठेवा

आजकाल जीन्स हा प्रत्येकाच्याच वॉर्डरोबचा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग बनला आहे. ऑफिस, कॉलेज असो वा एखादी

Nashik : ८ हजारांहून अधिक नागरिकांनी केली रोपांसाठी नोंदणी, मिशन ग्रीन मान्सून उपक्रमासाठी नाशिककर सरसावले

Nashik : ‘मिशन ग्रीन मान्सून’ साठी नाशिककरांनी पुढाकार घेतला आहे. मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांच्या संकल्पनेतून

Honey Benefits : रोज मध खाल्ल्याने शरीराला मिळतात 'हे' जबरदस्त फायदे; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

मुंबई : मध हा केवळ गोड पदार्थ नसून अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध असा नैसर्गिक पदार्थ मानला जातो. आयुर्वेदातही

Monsoon Foot Care: पावसाळ्यात पायांची काळजी कशी घ्याल? फॉलो करा या सोप्या टिप्स

पावसाळ्यात पाय सतत ओले राहिल्यामुळे बुरशीजन्य संसर्ग, दुर्गंधी, खाज आणि त्वचेच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे

Viral Love Story : NEET आंदोलनात गेले अन् जुळली रेशीमगाठ; जंतर-मंतरवर घडली अनोखी प्रेमकहाणी

Viral Love Story : दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेले नीट परीक्षा गैरप्रकाराविरोधातील आंदोलन देशभर चर्चेत