जळगावमध्ये नववर्षाची सुरुवात राड्याने

जळगाव : जळगाव जिल्ह्यात नववर्षाची सुरुवात राड्याने झाली. जिल्ह्यातील पाळधी गावात अफवा पसरली आणि दंगल झाली. अज्ञातांनी दगडफेक आणि जाळपोळ केली. यानंतर दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत बारा ते पंधरा दुकानं जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस पोहोचण्याआधी हिंसा तसेच जाळपोळ करणारे पळून गेले होते. या घटनेनंतर पाळधी गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले. सध्या पाळधी गावात तणावपूर्ण शांतता आहे.



हाती आलेल्या माहितीनुसार निवडक वाहने वेगाने गावातून गेली. याप्रसंगी वाहनांच्या दिशेने बघून काही तरुणांनी शिवीगाळ केली. या प्रकारावरुन दोन गटांमध्ये हाणामारीला सुरुवात झाली. हिंसेप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. दोषींवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे संकेत पोलिसांनी दिले आहेत.



अफवांवर विश्वास ठेवू नका. महत्त्वाचे काम नसल्यास घराबाहेर पडणे टाळा. कायदे पाळा. अफवा पसरवू नका. आपल्याला मिळालेल्या संवेदनशील माहितीची पोलिसांकरवी खातरजमा करुन घ्या. बेवारस वस्तूंना हात लावू नका; असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
Comments
Add Comment

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश; धान्य वितरणाची मुदत ३० जूनपर्यंत वाढवली

लाखो शिधापत्रिकाधारकांना दिलासा; उद्यापासून स्वस्त धान्य दुकानांमधून पुन्हा वितरण सुरू मुंबई, दि. २४ जून :

Chief Minister Devendra Fadnavis : कॉर्पोरेट जिहाद' रोखण्यासाठी कायद्यात बदल होणार

कॉर्पोरेट जिहादला लगाम, कायद्यात बदल होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; विधानसभा आणि विधान

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात ॲमेझॉनसाठी गुंतवणुकीच्या व्यापक संधी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी यांची मुख्यमंत्र्यांशी सदिच्छा भेट मुंबई, दि. २४ : डेटा सेंटर

Padma Awards 2026: पद्म पुरस्कारांनी गौरवला महाराष्ट्र; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववानांचा सन्मान

महाराष्ट्रातील मान्यवरांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; पद्म पुरस्कार प्रदान नवी दिल्ली, दि. २४ : देशातील सर्वोच्च

Ashadhi Wari : आषाढी वारीत भाविकांच्या सुविधांना प्राधान्य; कोणतीही गैरसोय होऊ देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• वारकऱ्यांच्या सेवेसाठी शासन सज्ज • आषाढी वारीसाठी सर्व विभागांकडून सुविधांची व्यापक तयारी • डिस्कव्हरी व