नवीन वर्षात विठुरायाच्या मंदिराला ३० किलो चांदीचा दरवाजा बसणार 

सोलापूर: लाडक्या विठ्ठलाला राज्यातील भाविक आपल्या परीने दान करीत असतात. याच प्रकारे नांदेड येथील एका भाविकाने श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार चांदीने मढविण्याचे कबूल केले आहे. यामुळे चांदीचा दरवाजा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सर्व दरवाजे चांदीचे करण्याचा प्रयत्न असणार आहे.


पंढरीचा पांडुरंग हा गरिबांचा, वारकऱ्यांचा देव. राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठलभेटीची ओढ लागलेले लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. मंदिर प्रशासनाकडे देणगी स्वरूपातही रक्कम दिली जाते. अनेकदा दानपेटीला मौल्यवान वस्तू देऊन कृतज्ञता व्यक्त केली जाते. दरम्यान, नांदेड येथील अरगुलकर परिवाराच्या वतीने या दरवाजास चांदी बसवून देण्यात येत आहे. यासाठी ३० किलो चांदी लागणार असून, याची किंमत जवळपास ३० लाख रुपये आहे.


श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचे काम सुरू असून, या अंतर्गत संत नामदेव पायरीवरील पितळी दरवाजा चांदीचा बनविण्याचा ठराव मंदिर समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आला होता. शंकर व नरसिमलू या बंधूंनी आपले वडील स्व. दिगंबर तुकाराम अरगुलकर व आई स्व. जनाबाई यांच्या स्मरणार्थ मंदिराचा दरवाजा चांदीचा करणार आहेत. दरवाजाला चांदी बसविण्याच्या कामामुळे सध्या येथून भाविकांना प्रवेश बंद असून, मुखदर्शनाची रांगदेखील रस्त्यावरून सुरू करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

What is E-Bond : आजपासून 'कागदी बाँड' हद्दपार! महसूलमंत्र्यांच्या निर्णयामुळे ई-बॉण्डची एन्ट्री; वाचा काय आहे ई-बॉण्ड?

मुंबई : महाराष्ट्रातील आयातदार आणि निर्यातदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला

दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाण्यात वाहन खरेदीचा उत्साह, आरटीओमध्ये ४ हजार २२६ वाहनांची नोंदणी

caठाणे (वार्ताहर) : शहरभर नवरात्री आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने धाव

गणपतीपुळे संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी ४२ लाखाची मदत

रत्नागिरी : श्रीक्षेत्र गणपतीपुळे संस्थानकडून मराठवाड्यातील महापुरातील नुकसानग्रस्तांकरिता ४२ लाखाची मदत

'ठाकरें'ना दसऱ्यालाच मोठा झटका! ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के, कोकणातील नेता शिंदे गटात दाखल

दसऱ्यादिवशीच मेळाव्यातच केला प्रवेश; कोकणातील माजी आमदार राजन तेली यांचा प्रवेश मुंबई: शिवसेना (उद्धव

जरांगेच्या डोक्यात शिजतंय काय? मराठ्यांपाठोपाठ आता शेतक-यांचा मसिहा बनणार, बघा कोणत्या केल्या मागण्या

मनोज जरांगेंची सरकारकडे ८ मोठ्या मागण्यांची यादी, शेतकऱ्याला दरमहा १०,००० पगार ते संपूर्ण कर्जमाफी जरांगेंचा

'असे हलके वागणारे माझे नाहीत!' गोंधळ घालणाऱ्या समर्थकांवर पंकजा मुंडे कडाडल्या

भगवान गडाचा वारसा हिरावून घेणाऱ्यांवर पंकजा मुंडेंचा हल्लाबोल बीड: