इंदूर : मध्य प्रदेशमधील इंदूर हे शहर स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळखले जाते. खवय्यांमध्ये इंदूरची सराफा गल्ली लोकप्रिय आहे. इतिहासात इंदूर शहराची ओळख राणी अहिल्याबाई होळकर यांच्यामुळे आहे. पण आता इंदूरला नवी ओळख मिळाली आहे. ही ओळख एका प्रयोगशील शेतकऱ्यामुळे मिळाली आहे. इंदूरच्या जयस्वाल नावाच्या जोडप्याने त्यांच्या साई कृपा कॉलनीतल्या ३२० चौरस फुटांच्या घरात केशर शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. घरातल्या शेतीत सुमारे तेरा लाख रुपयांची गुंतवणूक करून इंदूरच्या जोडप्याने सुमारे दोन किलो केशराचे उत्पन्न काढण्याचे नियोजन केले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात गुणवत्तेनुसार केशर प्रति किलो पाच ते आठ लाख रुपये दराने विकले जाते. यामुळे शेतीसाठी केलेली गुंतवणूक वसूल होईल; असा विश्वास जयस्वाल दांपत्याने व्यक्त केला आहे.
घरात शेती करण्यासाठी केशराचे बियाणे जम्मू काश्मीरमधील पंपोर येथून आणण्यात आले. शेतीसाठी घरात तापमान नियंत्रक यंत्रणा बसवण्यात आली. आवश्यकतेनुसार तापमान आठ ते पंचवीस अंश से. दरम्यान नियंत्रित केले जाते. खते – पाणी आवश्यक त्या प्रमाणात देऊन नियंत्रित पद्धतीने घरात केशराची शेती केली जाते. दररोज दिवसाचे चार ते सहा तास शेतीशी संबंधित कामं केली जातात.
काश्मीरला फिरायला गेलो त्यावेळी केशराची शेती करण्याचा विचार पहिल्यांदा केला. घरात बंदीस्त वातावरणात नियंत्रित पद्धतीने ही शेती करण्याचा अभिनव प्रयोग केला. या प्रयोगाला मिळत असलेले यश बघता भविष्यात केशर शेतीतून आणखी उत्पन्न काढणे शक्य होईल, असा विश्वास जयस्वाल दांपत्याने व्यक्त केला आहे.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…