saffron at home : इंदूरच्या घरात केशर शेती

इंदूर : मध्य प्रदेशमधील इंदूर हे शहर स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळखले जाते. खवय्यांमध्ये इंदूरची सराफा गल्ली लोकप्रिय आहे. इतिहासात इंदूर शहराची ओळख राणी अहिल्याबाई होळकर यांच्यामुळे आहे. पण आता इंदूरला नवी ओळख मिळाली आहे. ही ओळख एका प्रयोगशील शेतकऱ्यामुळे मिळाली आहे. इंदूरच्या जयस्वाल नावाच्या जोडप्याने त्यांच्या साई कृपा कॉलनीतल्या ३२० चौरस फुटांच्या घरात केशर शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. घरातल्या शेतीत सुमारे तेरा लाख रुपयांची गुंतवणूक करून इंदूरच्या जोडप्याने सुमारे दोन किलो केशराचे उत्पन्न काढण्याचे नियोजन केले आहे.



आंतरराष्ट्रीय बाजारात गुणवत्तेनुसार केशर प्रति किलो पाच ते आठ लाख रुपये दराने विकले जाते. यामुळे शेतीसाठी केलेली गुंतवणूक वसूल होईल; असा विश्वास जयस्वाल दांपत्याने व्यक्त केला आहे.


घरात शेती करण्यासाठी केशराचे बियाणे जम्मू काश्मीरमधील पंपोर येथून आणण्यात आले. शेतीसाठी घरात तापमान नियंत्रक यंत्रणा बसवण्यात आली. आवश्यकतेनुसार तापमान आठ ते पंचवीस अंश से. दरम्यान नियंत्रित केले जाते. खते - पाणी आवश्यक त्या प्रमाणात देऊन नियंत्रित पद्धतीने घरात केशराची शेती केली जाते. दररोज दिवसाचे चार ते सहा तास शेतीशी संबंधित कामं केली जातात.



काश्मीरला फिरायला गेलो त्यावेळी केशराची शेती करण्याचा विचार पहिल्यांदा केला. घरात बंदीस्त वातावरणात नियंत्रित पद्धतीने ही शेती करण्याचा अभिनव प्रयोग केला. या प्रयोगाला मिळत असलेले यश बघता भविष्यात केशर शेतीतून आणखी उत्पन्न काढणे शक्य होईल, असा विश्वास जयस्वाल दांपत्याने व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच