saffron at home : इंदूरच्या घरात केशर शेती

इंदूर : मध्य प्रदेशमधील इंदूर हे शहर स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळखले जाते. खवय्यांमध्ये इंदूरची सराफा गल्ली लोकप्रिय आहे. इतिहासात इंदूर शहराची ओळख राणी अहिल्याबाई होळकर यांच्यामुळे आहे. पण आता इंदूरला नवी ओळख मिळाली आहे. ही ओळख एका प्रयोगशील शेतकऱ्यामुळे मिळाली आहे. इंदूरच्या जयस्वाल नावाच्या जोडप्याने त्यांच्या साई कृपा कॉलनीतल्या ३२० चौरस फुटांच्या घरात केशर शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. घरातल्या शेतीत सुमारे तेरा लाख रुपयांची गुंतवणूक करून इंदूरच्या जोडप्याने सुमारे दोन किलो केशराचे उत्पन्न काढण्याचे नियोजन केले आहे.



आंतरराष्ट्रीय बाजारात गुणवत्तेनुसार केशर प्रति किलो पाच ते आठ लाख रुपये दराने विकले जाते. यामुळे शेतीसाठी केलेली गुंतवणूक वसूल होईल; असा विश्वास जयस्वाल दांपत्याने व्यक्त केला आहे.


घरात शेती करण्यासाठी केशराचे बियाणे जम्मू काश्मीरमधील पंपोर येथून आणण्यात आले. शेतीसाठी घरात तापमान नियंत्रक यंत्रणा बसवण्यात आली. आवश्यकतेनुसार तापमान आठ ते पंचवीस अंश से. दरम्यान नियंत्रित केले जाते. खते - पाणी आवश्यक त्या प्रमाणात देऊन नियंत्रित पद्धतीने घरात केशराची शेती केली जाते. दररोज दिवसाचे चार ते सहा तास शेतीशी संबंधित कामं केली जातात.



काश्मीरला फिरायला गेलो त्यावेळी केशराची शेती करण्याचा विचार पहिल्यांदा केला. घरात बंदीस्त वातावरणात नियंत्रित पद्धतीने ही शेती करण्याचा अभिनव प्रयोग केला. या प्रयोगाला मिळत असलेले यश बघता भविष्यात केशर शेतीतून आणखी उत्पन्न काढणे शक्य होईल, असा विश्वास जयस्वाल दांपत्याने व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च