Bank Holiday : बँकांचे कामकाज तीन दिवस राहणार बंद

मुंबई : महाराष्ट्रात तीन दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. ग्राहकांनी या सुट्या लक्षात ठेवून बँकेशी संबंधित कामांचे नियोजन करावे, असे आवाहन रिझर्व्ह बँकेने केले आहे.


आज मंगळवार २४ डिसेंबर आहे आणि वर्ष पुढल्या आठवड्यात मंगळवार ३१ डिसेंबर रोजी संपणार आहे. या कालावधीत महाराष्ट्रात तीन दिवस बँकांचे कामकाज बंद असेल. राज्यात बुधवार २५ डिसेंबर रोजी नाताळ अर्थात ख्रिसमस निमित्त बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. यानंतर २८ डिसेंबर रोजी चौथा शनिवार म्हणून नियमानुसार बँकांचे कामकाज बंद असेल. नंतर २९ डिसेंबर रोजी रविवार म्हणून नियमानुसार बँकांचे कामकाज बंद असेल. यामुळे वर्ष संपण्याच्या सुमारास राज्यात बँकांचे कामकाज बुधवार २५ डिसेंबर, शनिवार २८ डिसेंबर आणि रविवार २९ डिसेंबर असे तीन दिवस बंद राहणार आहे. बँकांचे कामकाज बंद राहणार असले तरी एटीएम सेवा, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग सुरू राहणार आहे. यामुळे बँकेत न जाता दैनंदिन आर्थिक व्यवहार करणाऱ्या कोट्यवधी बँक ग्राहकांचे काम विना अडथळा सुरू राहणार आहे.


बँकांचे कामकाज 'या' दिवशी बंद राहणार




  1. बुधवार २५ डिसेंबर २०२४ - नाताळ अर्थात ख्रिसमस निमित्त सुटी

  2. शनिवार २८ डिसेंबर २०२४ - चौथा शनिवार, सुटी

  3. रविवार २९ डिसेंबर २०२४ - रविवारची सुटी

Comments
Add Comment

Flipkart–Uber Partnership : राईड्सवर मिळणार सुपरकॉइन्स, रिवॉर्ड इकोसिस्टमचा विस्तार

मुंबई : भारतातील प्रमुख ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने देशातील आघाडीचा मोबिलिटी प्लॅटफॉर्म उबरसोबत धोरणात्मक

Dombivali News : पर्यटनासाठी कोकणात गेलेल्या डोंबिवलीच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

डोंबिवली : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील आरे समुद्र किनाऱ्यावर घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत डोंबिवलीतील २४

Pune Crime : धक्कादायक ! शरीरात दैवी शक्तीचा वास असल्याचं भासवून महिलेवर अत्याचार

पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात एका भोंदूबाबानं चक्क अंगात देवी

Raja Shivaji : आशा भोसलेंच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा, 'राजा शिवाजी' सिनेमाबद्दल रितेशनं घेतला 'हा' मोठा निर्णय

मुंबई : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या बहुप्रतिक्षित सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. या सिनेमाचा

Solapur News : झाडाला बांधलेली दोरी सुटली आणि... सख्ख्या भावंडांवर काळाचा घाला

सोलापूर : सोलापूर तालुक्यातील औज मंद्रूप परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अंकलगी वस्तीवरील शेततळ्यात बुडून

Mumbai Local : आता पश्चिम रेल्वेचा प्रवास होणार अधिक सोयीस्कर, लवकरच या स्थानकांवर धावणार 15 डब्यांची लोकल

मुंबई : पश्चिम रेल्वेचा प्रवास लवकरच अधिक सोयीस्कर होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील विरार ते डहाणूदरम्यान १९९४