Tadoba Tiger : ताडोबात आणखी दोन वाघांना लावले ‘रेडिओ कॉलर’

  80

चंद्रपूर: ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये आणखी दोन अवयस्क नर वाघांना ‘रेडिओ कॉलर’ लावण्यात आले आहे. परिणामी त्यामुळे एका आठवड्यात कॉलर केलेल्या वाघांची संख्या चार झाली आहे. वाघांचे विखुरणे, ‘कॉरिडॉरचे मॅपिंग’ आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे याचा अभ्यास करणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे. दरम्यान प्रकल्पांतर्गत येत्या काही महिन्यांत आणखी १० वाघांना रेडिओ कॉलर केले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

‘रॅपिड रेस्क्यू टीम’ आणि डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थान (डब्लूआयआय) च्या संयुक्त विद्यमाने मुल (बफर) अंतर्गत केसलाघाट जंगलात केलेल्या संयुक्त कारवाईत रविवारी वाघिणीचे दोन नर शावक टी-२९ (के -निशाण) रेडिओ कॉलर केले गेले. आता जे जंगलात विखुरण्यासाठी तयार आहेत, अश्या दोन्ही ‘कॉलर’ केलेले वाघ अवयस्क नर आहेत.. याआधी टी-२९ वाघिणीचे शावक आणि टी-१६२ चे दुसरे शावक यांना बुधवारी अशाच संयुक्त ऑपरेशनमध्ये ‘रेडिओ कॉलर’ केले गेले होते.




ताडोबा अंतर्गत जवळजवळ सर्व भाग मोठ्या संख्येन वाघांनी आधीच व्यापलेला असल्याने, कॉलर केलेले शावक प्रकल्पातून बाहेर पडण्याची आणि आजूबाजूच्या जंगलात जाण्याची शक्यता जास्त आहे. या वाघांच्या हालचालींचा मागोवा घेतल्याने केवळ त्यांच्या विखुरण्याच्या पद्धतींचा अभ्यास करण्यात मदत होणार नाही, तर वन्यजीव, कॉरिडॉरचे मॅपिंग करण्यात आणि मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यात मदत होईल असे सूत्रांचे म्हणणे आहे.

सदर उपक्रम ‘लॉन्ग टर्म मॉनिटरिंग ऑफ टायगर्स’, ‘को-प्रिडेटर्स’ आणि’ प्रे स्पीसीज इन टीएटीआर ॲण्ड ॲण्डजाईनिंग लँडस्केप्स’ या चालू संशोधन प्रकल्पाचा एक भाग आहे. हा राज्य सरकारच्या मान्यतेने २०१४ पासून सुरु आहे. प्रकल्पातील पुढील प्रगती अतिरिक्त ‘रेडिओ कॉलर’ खरेदी करण्यावर अवलंबून आहे. आंतरराष्ट्रीय पुरवठादारांकडून प्राप्त केले जातात. ताडोबा निरीक्षण आणि संशोधन प्रयत्न सुरू ठेवण्यासाठी लवकरच आणखी १० कॉलरसाठी ‘ऑर्डर’ देण्याची योजना आखली असल्याची माहिती समोर आली आहे

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक