Thirty First Party : थर्टी फस्ट'च्या पार्टीवर पोलिसांची करडी नजर!

नाशिक : नवीन वर्षाला (New Year) सुरुवात होण्यासाठी दोन आठवडे उरले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सगळेच उत्सुक असतात. यावेली अनेकजण ३१ डिसेंबर हा वर्षातील शेवटचा दिवस जल्लोषात (31st Party) जागवतात. बहुतांश नागरिक मित्र किंवा परिवारासोबत पार्टीचे बेत आखतात. त्यात मद्यसेवन, मांसाहार मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र या पार्टीनंतर अनेक ठिकाणी अपघात किंवा घातपात होण्याची शक्यता असते. यामुळे आता शहर व ग्रामीण पोलिस सतर्क झाले असून थर्टी फस्ट'च्या पार्टीवर पोलिसांची करडी (Police On Action Mode) नजर असणार आहे.



ग्रामीण पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिलेल्या आदेशानुसार, पोलिस ठाणेनिहाय तसेच स्थानिक गुन्हे शाखेतर्फे तसेच साध्या वेशातील पोलिसांमार्फत पार्ट्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे. शहरासह जिल्ह्यात नाकाबंदी करून मद्यपी चालकांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच पोलिस ठाणेनिहाय हॉटेल, बार, रेस्टॉरंट, कॅफेचालकाना सूचना दिल्या असून रात्री उशिरापर्यंत वाहन तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर यावेळी ड्रंक अँड ड्राइव्ह मोहीमही शहरात राबवली जाणार आहे. (Thirty First Party)

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये