गेल्या ३ वर्षात देशाचा सरासरी जीडीपी ८.३ टक्के - अर्थमंत्री

नवी दिल्ली : गेल्यी ३ वर्षात भारताचा सरासरी जीडीपी ८.३ टक्के होता अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. लोकसभेत आज, मंगळवारी देशाच्या व्यापक कामगिरीचा आढावा सादर करताना त्या बोलत होत्या.


यावेळी देशातील नियंत्रित महागाई, शाश्वत जीडीपी वाढ आणि उत्पादन क्षेत्रातील लवचिकता या मुद्द्यांवर भर देताना सीतारामन म्हणाल्या की, गेल्या ३ वर्षांत भारताचा जीडीपी सरासरी ८.३ टक्के होता, तो स्थिर आणि शाश्वत वाढ दर्शवत आहे. दुसऱ्या तिमाहीत जीडीपी अपेक्षेहून कमी म्हणजे ५.४ टक्के असल्याचे त्यांनी मान्य केले. हा प्रकार म्हणजे तात्पुरते अपयश असल्याचे सातारामन म्हणाल्यात. तसेच येत्या तिमाहीत अर्थव्यवस्थेत निरोगी वाढ दिसून येईल, अशी ग्वाही सीतारामन यांनी दिली.


विरोधी पक्षाकडून केलेल्या सामान्य मंदीच्या दाव्यांचे खंडन करताना, सीतारामन म्हणाल्या की, अर्ध्या उत्पादन क्षेत्रांमध्ये मजबूत वाढ दिसून येत आहे. त्यांनी आश्वासन दिले की काही क्षेत्रांमध्ये झालेली घसरण औद्योगिक क्रियाकलापांमध्ये व्यापक मंदीचे संकेत देत नाही, परिस्थिती सुधारत असताना या क्षेत्राची पुन्हा उभारी घेण्याची क्षमता पुन्हा दर्शवत, असल्याचेही त्यांनी सांगितले. एनडीए सरकार सत्तेत आल्यापासून सरकारने आर्थिक निर्देशांक स्थिर करण्यावर प्रमुख लक्ष केंद्रित केले आहे. यूपीए राजवटीत आर्थिक निर्देशांक दुहेरी अंकी वाढ झालेली किरकोळ महागाई सध्याच्या प्रशासनात आटोक्यात आणण्यात आली आहे.


समावेशक विकास सुनिश्चित करण्यासाठी सरकारने उज्ज्वला योजनेसारख्या सामाजिक कल्याणकारी कार्यक्रमांना देखील प्राधान्य दिले आहे. जागतिक अडचणी आणि देशांतर्गत समायोजनांमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना न जुमानता, जीडीपी वाढ मजबूत राहिली आहे, धोरणात्मक सुधारणा आणि शाश्वत धोरणात्मक हस्तक्षेपांमुळे ती बळकट झाल्याचे देखील अर्थमंत्र्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Chandigarh Blast : भाजपच्या कार्यालयाबाहेर स्फोट, पोलीस घटनास्थळी

चंदिगड : चंदिगडच्या सेक्टर ३७ मध्ये भाजपच्या कार्यालयाबाहेर मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला.

शेअर बाजारात तेजीचे पुनरागमन; सेन्सेक्स १,१८६.७७ अंकांनी वधारला

बाजारातील मजबूत परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांनी एका दिवसात ९.८२ लाख कोटी रुपये कमावले नवी दिल्ली : पश्चिम आशिया

New Rules From 1 April 2026 : F&O ट्रेडर्सना सरकारचा झटका; डिजिटल पेमेंट आता अधिक सुरक्षित, पण...आजपासून नवीन नियम कोणते?

नवी दिल्ली : आज १ एप्रिलपासून देशातील कर प्रणालीत, विशेषतः शेअर बायबॅकच्या संदर्भात महत्त्वाचे बदल लागू झाले

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री गडकरींनी सांगितली अहमदाबाद-धोलेरा ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गाची खास वैशिष्ट्ये

नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींनी नुकतंच अहमदाबाद-धोलेरा ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गाचे उद्घाटन केले. आज, केंद्रीय

Iran-Israel-US War: भारताला दिलासा, तीन आठवड्यांपासून अडकलेल्या एलपीजी टँकरने चतुराईने पार केली होर्मुझची सामुद्रधुनी

नवी दिल्ली: इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्याला एक महिना उलटूनही, युद्ध शमण्याची कोणतीही चिन्हे

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी केले गुजरातमधील साणंद येथील 'केन्स सेमीकॉन' प्रकल्पाचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळावर (३१ मार्च) रोजी साणंद येथे ‘केन्स टेक्नॉलॉजी’च्या सेमीकंडक्टर