विधानपरिषद सभापतीपदाची निवडणूक १९ डिसेंबरला 

  81

नागपूर : मागील दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानपरिषद सभापती पदाची निवडणूक १९ डिसेंबर या दिवशी होणार आहे, अशी घोषणा उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी १७ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत केली. यंदाच्या अधिवेशनात  विधान परिषदेच्या सभापतीची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार आता ही निवडणूक होणार आहे.


राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार विधानपरिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी जाहीर केला. त्यानुसार १९ डिसेंबर रोजी मतदान होईल. माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सभापतीपद रिक्त आहे. या पदासाठी १९ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी १८ डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर अर्जांची छाननी होणार असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी जाहीर केले.


वास्तविक रामराजे नाईक निंबाळकर यांची मुदत ऑगस्ट २०२२ मध्ये संपल्यापासून विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त आहे; मात्र आगामी राजकारणाच्या दृष्टीने हे पद भरले जाईल, अशी चर्चा चालू आहे. विधान परिषदेच्या सभापतीपदी पदावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. विधानसभेचे अध्यक्षपद हे भाजपकडे आहे, तर विधान परिषदेचे उपसभातीपद हे शिवसेनेकडे आहे. त्यामुळे या पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य निवडला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या