Grinder Machine Kills : ग्राईंडर मशिनने घेतला १९ वर्षीय मुलाचा जीव; आधी शर्ट अडकून खेचला गेला ...

मुंबई : मुंबईतल्या वरळी येथील नरिमन भाट नगर परिसरात एका कर्मचाऱ्याचा ग्राईंडर मशिनमध्ये अडकून धक्कादायक मृत्यू झाला. सूरज यादव (१९ वर्षीय) असं मृत तरुणाचं नाव आहे. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आलं आहे.



खाद्यपदार्थांच्या फॅक्टरीत चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरवर काम करताना त्या कर्मचाऱ्याचा शर्ट अडकून तो आत ओढला गेला. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला बाहेर काढलं. पण या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी दादर पोलिसांनी फॅक्टरीचा मालक सचिन कोठेकरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. निष्काळजीपणामुळं एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा मालकावर दाखल करण्यात आला आहे.



कसा घडला अपघात ???


सूरज यादव सचिन कोठेकर यांच्या चायनीज पदार्थांच्या गाडीवर कामाला होता. त्याचा चुलत भाऊ महेश यादव याने दिलेल्या तक्रारीनुसार चायनीज भेळ आणि भजी तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल ग्राईंडर मशिनवर तयार केला जातो. हे मशिन नरिमन भाटनगर येथील एका खोलीत ठेवले होते. सचिन यांनी सूरजला कच्चा माल आणण्यासाठी ग्राईंडर असलेल्या खोलीकडे पाठवले. सूरज मशिनमधून माल काढत असताना मशिनमध्येच अडकला. या संदर्भातील माहिती मिळताच सचिन कोठेकर आणि इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, पोलिसांच्या मदतीने सूरजला मशिनमधून बाहेर काढले. जखमी अवस्थेत त्याला केईएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी सूरजला मृत घोषित केले. पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत सूरजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

Comments
Add Comment

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.

नारळासाठी ४५ रुपयांची फोडणी; आवक घटल्याने मुंबईकरांना भुर्दंड

मुंबई : सण, उत्सव कालावधीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईकरांना सध्या या नारळासाठी ४५ ते ५० रुपये मोजावे

नरिमन पॉइंट ते वसईपर्यंत १० मार्गांवर होणार जलवाहतूक

मुंबई : महामुंबईत १० मार्गांवर जलवाहतूक सुरू होणार आहे. याद्वारे नव्या विमानतळाला चार मार्ग जोडले जाणार आहेत.

काय चाललंय काय ? एका महिन्यात तीन वेळा बंद पडली मोनोरेल

मुंबई : मध्य मुंबई आणि पूर्वेकडील उपनगरे यांना जोडणारी मोनोरेल ही वेगाने आरामदायी प्रवास करण्यासाठी सुरू

महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांनी 'या' भाषेत घेतली शपथ

मुंबई : आचार्य देवव्रत यांनी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी राजभवनात झालेल्या सोहळ्यात राज्यपालपदाची शपथ