Grinder Machine Kills : ग्राईंडर मशिनने घेतला १९ वर्षीय मुलाचा जीव; आधी शर्ट अडकून खेचला गेला ...

  116

मुंबई : मुंबईतल्या वरळी येथील नरिमन भाट नगर परिसरात एका कर्मचाऱ्याचा ग्राईंडर मशिनमध्ये अडकून धक्कादायक मृत्यू झाला. सूरज यादव (१९ वर्षीय) असं मृत तरुणाचं नाव आहे. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आलं आहे.



खाद्यपदार्थांच्या फॅक्टरीत चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरवर काम करताना त्या कर्मचाऱ्याचा शर्ट अडकून तो आत ओढला गेला. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला बाहेर काढलं. पण या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी दादर पोलिसांनी फॅक्टरीचा मालक सचिन कोठेकरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. निष्काळजीपणामुळं एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा मालकावर दाखल करण्यात आला आहे.



कसा घडला अपघात ???


सूरज यादव सचिन कोठेकर यांच्या चायनीज पदार्थांच्या गाडीवर कामाला होता. त्याचा चुलत भाऊ महेश यादव याने दिलेल्या तक्रारीनुसार चायनीज भेळ आणि भजी तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल ग्राईंडर मशिनवर तयार केला जातो. हे मशिन नरिमन भाटनगर येथील एका खोलीत ठेवले होते. सचिन यांनी सूरजला कच्चा माल आणण्यासाठी ग्राईंडर असलेल्या खोलीकडे पाठवले. सूरज मशिनमधून माल काढत असताना मशिनमध्येच अडकला. या संदर्भातील माहिती मिळताच सचिन कोठेकर आणि इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, पोलिसांच्या मदतीने सूरजला मशिनमधून बाहेर काढले. जखमी अवस्थेत त्याला केईएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी सूरजला मृत घोषित केले. पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत सूरजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता