समुद्रमार्गाने गाठा कोकणाची वाट; मुंबई–विजयदुर्ग रो रो फेरी १ मार्चपासून सेवेत; जाणून घ्या वेळ आणि तिकीट

मुंबई : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी समुद्रमार्गाचा पर्याय पुन्हा एकदा उपलब्ध होत आहे. मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान रो रो फेरी सेवा १ मार्च २०२६ पासून सुरू होत असून, या सुविधेमुळे रस्त्यावरील दीर्घ आणि वाहतूक कोंडीचा प्रवास टाळता येणार आहे.


आणि याचे उदघाटन सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणे स्वतः मुंबई ते विजयदुर्ग असा प्रवास करून या सुविधेचे उदघाटन करणार आहेत.



असा असेल प्रवासाचा आराखडा


‘एम२एम प्रिंसेस’ ही फेरी सकाळी ८ वाजता मुंबईतून भाऊच्या धक्क्यावरून सुटेल आणि दुपारी ३ वाजता विजयदुर्ग येथे पोहोचेल. परतीची फेरी दुपारी १२ वाजता विजयदुर्गहून निघून सायंकाळी ७ वाजेपर्यंत मुंबईत दाखल होईल. एकूण प्रवासाचा कालावधी सुमारे सात तासांचा असेल.



मार्च २०२६ मधील फेऱ्या


मुंबई ते विजयदुर्ग : १, ४, ७, ११, १४, १८, २१ आणि २५ मार्च
विजयदुर्ग ते मुंबई :२, ५, ८, १२, १५, १८, २२ आणि २६ मार्च



भाडे तपशील


इकॉनॉमी – २,५०० रुपये
प्रीमियम इकॉनॉमी – ४,००० रुपये
बिझनेस क्लास – ७,५०० रुपये
फर्स्ट क्लास – ९,००० रुपये
दुचाकी – १,००० रुपये
सायकल – ६०० रुपये
चारचाकी – ६,००० रुपये
बस – १३,००० ते २१,००० रुपये



कोकणाला नवा पर्याय


समुद्रमार्गामुळे प्रवास अधिक सुखकर होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः पर्यटन हंगामात या सेवेचा फायदा होणार असून स्थानिक व्यवसाय, हॉटेल उद्योग आणि व्यापार क्षेत्रालाही चालना मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र