२१ फेब्रुवारीलाच का साजरा करतात जागतिक मातृभाषा दिन? जाणून घ्या इतिहास

मुंबई : भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेचे जतन करण्याच्या उद्देशाने दरवर्षी २१ फेब्रुवारी रोजी ‘जागतिक मातृभाषा दिन’ साजरा केला जातो. बहुभाषावादाला प्रोत्साहन देणे आणि लोप पावत चाललेल्या भाषांबाबत जागरूकता निर्माण करणे हा या दिवसामागील प्रमुख हेतू आहे.


हा दिवस प्रथम १९९९ साली UNESCO च्या पुढाकाराने साजरा करण्यात आला. त्यानंतर २००२ मध्ये युनाइटेड नेशनच्या आमसभेने अधिकृत मान्यता दिली. तेव्हापासून २१ फेब्रुवारी हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो.



भाषिक विविधतेचे महत्त्व


जगभरात सुमारे सात हजार भाषा बोलल्या जातात. भारतात संविधानमान्य २२ भाषा असून, विविध बोलीभाषांसह सुमारे १३०० हून अधिक मातृभाषा अस्तित्वात आहेत. जागतिकीकरण, तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि स्थलांतर यामुळे अनेक भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर मातृभाषेचे जतन, प्रसार आणि शिक्षणात मातृभाषेचा वापर वाढवणे यावर भर देण्यासाठी विविध देशांमध्ये कार्यक्रम, परिसंवाद आणि जनजागृती उपक्रम आयोजित केले जातात.



२१ फेब्रुवारीच का?


१९५२ साली तत्कालीन पाकिस्तानमध्ये उर्दूला अधिकृत भाषा घोषित करण्याच्या निर्णयाविरोधात ढाका विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला, ज्यात काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बंगाली भाषेलाही अधिकृत मान्यता देण्यात आली. भाषिक हक्कांसाठी दिलेल्या या बलिदानाच्या स्मरणार्थ २१ फेब्रुवारी हा दिवस जागतिक भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.


जागतिक मातृभाषा दिन हा केवळ एक औपचारिक दिन नसून, प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगण्याचा आणि तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करण्याचा दिवस मानला जातो.

Comments
Add Comment

Ladki Bahin Yojana : ई-केवायसी होत राहील, पण एकही पात्र लाडकी बहिण ओवाळणीपासून वंचित राहणार नाही

आमचा अजेंडा सत्तेची खुर्ची मिळवणे नाही तर लोकांच्या मनात आपली जागा निर्माण करणे आहे अंधेरीतील लाडक्या बहिणींचा

Ashwini Bhide : इंधन बचतीसाठी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचा पुढाकार

मुंबई (सचिन धानजी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि हरित ऊर्जेच्या वापराबाबत

Khar tree collapse : खारमध्ये रिक्षावर झाड कोसळल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबई : खार (पश्चिम) येथील लिंकिंग रोडवर राजकुमार ज्वेलर्सजवळ रिक्षावर झाड कोसळल्याने,१४ वर्षीय मुलीचा मृत्यू

NEET UG 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला CBI कोठडी, नांदेडमधये पालकांची सीबीआय चौकशी

मुंबई : नीट युजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि