२१ फेब्रुवारीलाच का साजरा करतात जागतिक मातृभाषा दिन? जाणून घ्या इतिहास

मुंबई : भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेचे जतन करण्याच्या उद्देशाने दरवर्षी २१ फेब्रुवारी रोजी ‘जागतिक मातृभाषा दिन’ साजरा केला जातो. बहुभाषावादाला प्रोत्साहन देणे आणि लोप पावत चाललेल्या भाषांबाबत जागरूकता निर्माण करणे हा या दिवसामागील प्रमुख हेतू आहे.


हा दिवस प्रथम १९९९ साली UNESCO च्या पुढाकाराने साजरा करण्यात आला. त्यानंतर २००२ मध्ये युनाइटेड नेशनच्या आमसभेने अधिकृत मान्यता दिली. तेव्हापासून २१ फेब्रुवारी हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो.



भाषिक विविधतेचे महत्त्व


जगभरात सुमारे सात हजार भाषा बोलल्या जातात. भारतात संविधानमान्य २२ भाषा असून, विविध बोलीभाषांसह सुमारे १३०० हून अधिक मातृभाषा अस्तित्वात आहेत. जागतिकीकरण, तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि स्थलांतर यामुळे अनेक भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर मातृभाषेचे जतन, प्रसार आणि शिक्षणात मातृभाषेचा वापर वाढवणे यावर भर देण्यासाठी विविध देशांमध्ये कार्यक्रम, परिसंवाद आणि जनजागृती उपक्रम आयोजित केले जातात.



२१ फेब्रुवारीच का?


१९५२ साली तत्कालीन पाकिस्तानमध्ये उर्दूला अधिकृत भाषा घोषित करण्याच्या निर्णयाविरोधात ढाका विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला, ज्यात काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बंगाली भाषेलाही अधिकृत मान्यता देण्यात आली. भाषिक हक्कांसाठी दिलेल्या या बलिदानाच्या स्मरणार्थ २१ फेब्रुवारी हा दिवस जागतिक भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.


जागतिक मातृभाषा दिन हा केवळ एक औपचारिक दिन नसून, प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगण्याचा आणि तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करण्याचा दिवस मानला जातो.

Comments
Add Comment

BMC : महापालिकेला अखेर आठवले दुषित पाणी आणि गळती

- पाणी गळती शोधून काढण्यासाठी पथके तैनात करण्याचेही बांगरांनी दिले आदेश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

BMC : मुंबईतील ओसी नसलेल्या इमारतींचा मार्ग मोकळा

- महापालिकेच्यावतीने राबवण्यात येणार अभय योजना - सन १७ नोव्हेंबर २०१६ पूर्वीच्या इमारतींना मिळणार लाभ सचिन

पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या ब्रिटीशकालिन पर्जन्य जलवाहिन्यांचे ५० वर्षांनी वाढणार आयुष्य

मुंबई: मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई शहर विभागातील १०० वर्षे जुन्या भूमिगत कमानी पर्जन्य जलवाहिन्यांचे

Kishori Pednekar: विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या पेडणेकर आधीच पोहोचल्या नाल्याच्या काठावर

मुंबई: मुंबई महापालिकेत मागील २५ वर्षांत सत्तेवर असताना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नाही तर जुनच्या

प्रकल्पबाधितांच्या सदनिका वाटपाची प्रक्रिया सुलभ करा; महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले मालमत्ता विभागाला निर्देश

मुंबई: मुंबईतील सदनिकांची वाढती मागणी लक्षात घेता, प्रकल्पबाधित व्यक्तींसाठी (पी ए पी) सदनिका उपलब्ध करून

Ashwini Bhide: गारगाईसह समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाला गती द्या; महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे जलखात्याला आदेश

मुंबई: समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी महानगरपालिकेने हाती घेतलेल्या २०० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या ४००