२१ फेब्रुवारीलाच का साजरा करतात जागतिक मातृभाषा दिन? जाणून घ्या इतिहास

मुंबई : भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेचे जतन करण्याच्या उद्देशाने दरवर्षी २१ फेब्रुवारी रोजी ‘जागतिक मातृभाषा दिन’ साजरा केला जातो. बहुभाषावादाला प्रोत्साहन देणे आणि लोप पावत चाललेल्या भाषांबाबत जागरूकता निर्माण करणे हा या दिवसामागील प्रमुख हेतू आहे.


हा दिवस प्रथम १९९९ साली UNESCO च्या पुढाकाराने साजरा करण्यात आला. त्यानंतर २००२ मध्ये युनाइटेड नेशनच्या आमसभेने अधिकृत मान्यता दिली. तेव्हापासून २१ फेब्रुवारी हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो.



भाषिक विविधतेचे महत्त्व


जगभरात सुमारे सात हजार भाषा बोलल्या जातात. भारतात संविधानमान्य २२ भाषा असून, विविध बोलीभाषांसह सुमारे १३०० हून अधिक मातृभाषा अस्तित्वात आहेत. जागतिकीकरण, तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि स्थलांतर यामुळे अनेक भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर मातृभाषेचे जतन, प्रसार आणि शिक्षणात मातृभाषेचा वापर वाढवणे यावर भर देण्यासाठी विविध देशांमध्ये कार्यक्रम, परिसंवाद आणि जनजागृती उपक्रम आयोजित केले जातात.



२१ फेब्रुवारीच का?


१९५२ साली तत्कालीन पाकिस्तानमध्ये उर्दूला अधिकृत भाषा घोषित करण्याच्या निर्णयाविरोधात ढाका विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला, ज्यात काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बंगाली भाषेलाही अधिकृत मान्यता देण्यात आली. भाषिक हक्कांसाठी दिलेल्या या बलिदानाच्या स्मरणार्थ २१ फेब्रुवारी हा दिवस जागतिक भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.


जागतिक मातृभाषा दिन हा केवळ एक औपचारिक दिन नसून, प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगण्याचा आणि तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करण्याचा दिवस मानला जातो.

Comments
Add Comment

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,

Pune News : पुण्यात आता 'एनडीआरएफ'चा कायमस्वरूपी तळ

मावळमधील तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मुंबई : आपत्तीच्या काळात तातडीने मदत व बचाव

Wardha Crime : वर्ध्यातील रोठा येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरण; मुख्यमंत्र्यांचे जलदगती न्यायालयात खटला चालवण्याचे निर्देश

MUMBAI : वर्धा जिल्ह्यातील रोठा गावात घडलेली १२ वर्षीय मुलीवरील अत्यंत अमानुष क्रूरता आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण

Mumbai Local Train : मुंबई लोकल दुर्घटना! रुळ ओलांडताना महिलेचा रेल्वेखाली मृत्यू; विद्याविहार-घाटकोपरदरम्यान घडली घटना

मुंबई : मुंबईतील मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावर सोमवारी सायंकाळी एक दुर्दैवी दुर्घटना (Accident) घडली. विद्याविहार (Vidyavihar)

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अनमोल बिश्नोईविरुद्ध प्रोडक्शन वॉरंट; विशेष न्यायालयाचा आदेश

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात विशेष मकोका न्यायालयाने (MCOCA Court) अनमोल

Mumbai Crime Branch : मुंबईत गुन्हे शाखेची मोठी कारवाई; बेकायदेशीर वास्तव्याच्या संशयावरून 37 बांगलादेशी नागरिक ताब्यात

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) शहरातील विविध भागांत विशेष मोहीम राबवत बेकायदेशीररीत्या वास्तव्यास