Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महायुतीच्या ३९ मंत्र्यांनी घेतली शपथ

राज्यपालांनी नागपुरात दिली पद व गोपनियतेची शपथ


नागपूर : महायुतीच्या नवनिर्वाचित सरकारमधील 39 सहकाऱ्यांचा शपथविधी सोहळा आज, रविवारी नागपुरात पार पडला. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी या लोकप्रतिनिधींना राजभवनात पद व गोपनियतेची शपथ दिली.

राज्यमंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह २० मंत्रि‍पदे आली आहेत. शिवसेनेत एकनाथ शिंदेंसह १२ जणांना मंत्रि‍पदे मिळली आहेत. तर राष्ट्रवादीला अजित पवारांसह १० खाती मिळणार आहेत. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या शपथविधी सोहळ्यात महायुतीच्या 6 जणांना राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आलीय. नागपुरात झालेल्या शपथविधी सोहळ्यामध्ये भाजपच्या १९ शिवसेनेच्या ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.


यावेळच्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक जुन्या चेहऱ्यांना डच्चू देण्यात आला असून पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळेंचे मंत्रिमंडळात कमबॅक झाले आहे. भाजपतर्फे शपथ घेणाऱ्या लोकप्रतिनिधींमध्ये आमदार नितेश राणे, शिवेंद्र राजे भोसले, चंद्रकांत पाटील, पंकज भोयर, मंगलप्रभात लोढा, गिरीश महाजन, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, मेघना बोर्डीकर, अतुल सावे ,जयकुमार गोरे, माधुरी मिसाळ, चंद्रशेखर बावनकुळे, संजय सावकारे, अशोक उईके, आकाश फुंडकर आणि आशिष शेलार यांचा समावेश आहे.

शिवसेनेतर्फे शपथ घेणाऱ्यांमध्ये उदय सांमत, प्रताप सरनाईक, शंभूराज देसाई, योगश कदम, आशिष जैस्वाल, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, दादा भूसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट यांचा समावेश आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तमामा भरणे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, इंद्रनील नाईक, धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांनी पद व गोपनियतेची शपथ घेतली.

Comments
Add Comment

अशोक खरात कारनाम्याचा भांडाफोड, १८ मार्च रोजी कसा झाला आरोपी?, जाणून घ्या

नाशिक: बड्या बेड्या नेत्यांचा 'गुरु' असलेल्या कॅप्टन अशोक खरातच्या कारनाम्याचा भांडाफोड सुरू झाला आहे. जवळपास ५८

सोसाट्याचा वाऱ्यासह गाराचा पाऊस पडणार, हवामान विभागाकडून पाच जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका सोसणाऱ्या महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने महत्त्वाची अपडेट दिली

पेपर सुरु असताना विद्यार्थिंनीसोबत घडला लाजिरवाणा प्रकार, नेमकं घडलं काय?

नाशिक: नाशिकमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. १३ मार्च रोजी दहावीचा पेपर सुरू असताना एका

सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी; पोलिसांनी केलं आवाहन

संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहा

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ