Ulhasnagar : 'उल्हासनगरची वाढणार सांस्कृतिक ओळख'

मराठी संस्कृती भवनासाठी सरकारचा निधी मंजूर


उल्हासनगर : उल्हासनगरातील कॅम्प एक परिसरात बाल शिवाजी उद्यान, कॅम्प तीनमध्ये बोट क्लब सुशोभीकरण, कॅम्प पाचमध्ये महिला भवन तसेच मराठी संस्कृती भवन उभारले जाणार आहे. त्यासाठी १५ कोटी ५० लाखांच्या निधीची गरज आहे. यात सरकारचा हिस्सा देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रकल्पांचे काम लवकरच सुरू होणार आहे.



उल्हासनगर महापालिका क्षेत्रात शहरात भव्य क्रीडा संकूल, सांडपाणी योजना, पाणी योजना, ई-चार्जीग स्टेशन, परिवहन सेवा कार्यरत आहेत. यात आता तीन प्रकल्पांची भर पडणार आहे. उल्हासनगरच्या कॅम्प एक भागात बाल शिवाजी उद्यान, तसेच कॅम्प पाच भागात महिला आणि मराठी भवन उभारले जाणार आहे. कॅम्प एक भागातील उद्यानासाठी ५० लाखांचा आराखडा तयार केला होता. त्यानुसार महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी नगरोत्थान महाअभियानांतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून या प्रकल्पासह इतर चार प्रकल्पांसाठी सरकारने आपला हिस्सा देण्यास मंजुरी दिली आहे. राज्य सरकारकडून या प्रकल्पांसाठी ७० टक्के तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची ३० टक्के भागीदारीतून हे प्रकल्प पूर्ण होणार आहेत. या चारही प्रकल्पांसाठी १० कोटी ८५ लाख रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. एकूण १५ कोटी ५० लाख रुपयांच्या


खर्चातून हे प्रकल्प साकारले जाणार आहेत. यातील बाल शिवाजी उद्यानासाठी महापालिकेचा हिस्सा १५ लाखांचा आहे.
तसेच सरकारकडून यासाठी ३५ लाख रुपये मिळणार आहेत. कॅम्प तीन येथील बोट क्लबचे सुशोभिकरणही केले जाणार आहे. यातील एकूण ५ कोटी रुपये खर्च असलेल्या प्रकल्पात तीन कोटी ५ लाख रुपये सरकाकडून उपलब्ध केले जाणार आहेत. कॅम्प पाच भागातही महिला भवन उभारले जाणार आहे. त्यासाठी सरकारचे तीन कोटी ५ लाख रुपये आहेत. उल्हासनगरात मराठी संस्कृती भवनही उभारले जाणार आहे, या कामालाही आता गती मिळालेली आहे. त्यासाठी ५ कोटी रुपयांच्या खर्चातून मराठी संस्कृती भवन साकारले जाणार आहे. यात सरकारकडून ३ कोटी ५ लाख रुपयांच्या हिस्सा मंजूर करण्यात आला आहे. उल्हासनगरातील या सर्वच प्रकल्पांसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी यशस्वी प्रयत्न केले आहेत.

Comments
Add Comment

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया

कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक

ठाणे शहरात उभारणार १९ ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स

ठाणे (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात ई-वाहन वापराला

सायबर दृष्टी सेलचा डिजिटल साक्षरता प्रवास

कल्याण (प्रतिनिधी) : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये