Road Side Dogs : केडीएमसी क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा वाढला उच्छाद

कल्याण : केडीएमसी क्षेत्रात मोकाट भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. गेल्या काही दिवसांतील घटनामध्ये टिटवाळ्यात एका फिरस्त्या महिलेचे भटक्या मोकाट कुत्र्यानी शरीराचे लचके तोडले या हल्यात गंभीर जखमी असलेल्या महिलेवर जे-जे रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कल्याण पश्चिमेतील ८ वर्षीय शाळकरी मुलावर मोकाट भटक्या कुत्र्याने झेप घेत केलेल्या हल्यात त्यांच्या ओठाला गुप्तांगाचा चावल्याची घटना पाहता आणि यापूर्वीही मोकाट व भटक्या कुत्र्यांनी चावल्याच्या घटना घडल्या असल्यातरी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त प्रशासन करू शकत नाही हि शोकांतिका म्हणावी लागेल.


शहरातील भटक्या कुत्र्यांना प्रशासन आवर कसा घालणार असा प्रश्न ऐरणीवर आला आहे मनपा परिसरात स्टेशन लगतच्या रस्त्यावर रात्री येता जाताना १५ - २० कुत्र्यांचा कळप एकट्या दुकट्या माणसाला चहू बाजूनी घेराव घालतात. अशा प्रसंगी त्या माणसावर जीवावर आलेल्या प्रसंगातून बचावाशिवाय पर्याय नसतो. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे महाराष्ट्र प्रांतिक अधिनियमानुसार मनपा प्रशासनाचे काम आहे. परंतु भटक्या कुत्र्यांच्या तक्रारीतील तथ्य म्हणजे काय तर नागरिकांच्या भटक्या कुत्र्यांच्या तक्रारीनुसार प्रशासन वेळेनुसार डॉग व्हॅन पाठवून भटक्या कुत्र्यांना पकडण्याची कारवाई करून जीवरक्षा अँनिमल वेल्फेअर ट्रस्ट या संस्थेमार्फत कल्याण पश्चिमेतील निर्बीजीकरण केंद्रात आणून नसबंदी केली जाते व अँन्टी रेबीज लस दिली जाते.



तसेच दररोज शिजविलेला भात चिकन दिले जाते. तीन दिवस त्या कुत्र्याला निरीक्षणाखाली ठेऊन त्याला पुन्हा चौथ्या दिवशी ज्या ठिकाणाहून पकडले असते त्या ठिकाणी सोडले जाते. या बद्दल त्या संस्थेला ९८९ रुपये एका भटक्या कुत्र्यामागे दिले जातात. तसेच भटक्या मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नासंदर्भात मनपाने नवीन काही अँक्शन प्लँन तयार केला आहे की असे विचारले असता आधिकारी यांनी नाही असे गुळमुळीत उत्तर दिल्याने मनपा क्षेत्रात भटक्या मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.


२०१२ च्या पशुगणनेनुसार क. डो. मनपा क्षेत्रात ५५ हजार इतकी श्वानाची संख्या होती. दर पाच वर्षोनी पशुगणना होते. गेली १० वर्षे होऊन पशुगणना झाली नसून कोवीडनंतर आता यंदा पशुसंवर्धन विभाग मार्फत पशुगणना करण्याचे काम सुरू असून आजमतीस सुमारे ८० हजार इतक्या श्वानांची संख्या आसावी असे समजते.


भटक्या मोकाट कुत्र्याची संख्या वाढते की घटते यांचे उत्तर वाढते की घटते यांचे उत्तर प्रशासन देऊ शकले नाही. 'क' वर्ग महापालिका असून तीन चार महिन्यापूर्वी एजन्सी मार्फत पशुवैद्यकीय आधिकारी उपलब्ध झाला असल्याचे पुढे आले असून बिंदूनमावलीनुसार पशुवैद्यकीय आधिकारी भरती होणार असल्याचे आधिकारी सुत्राकडून माहिती मिळाली. प्रशासनाची भटक्या कुत्र्यांची कारवाई होऊन देखील परिस्थिती जैसे से थे आहे.



आरोग्य विभागाची माहिती


१ जानेवारी २०२४ पासून ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत १२,४०६ भटक्या मोकाट श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले असून यासाठी १ कोटी २२ लक्ष ६९ हजार ५३४ रू. खर्च झाला तरी भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होत नाही. तसेच १ जानेवारी २०२४ ते ३१ आँक्टोबर मनपा क्षेत्रात भटक्या मोकाट कुत्र्यांनी चावलेल्या तसेच कुत्रा चावलेल्या रेबीज लसीकरण केलेल्या रूग्णांची संख्या १८ हजार ७०५ इतकी असून १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत १८,९३९ इतक्या जणांना कुत्रे चावल्याच्या तसेच रेबिज लसीकरण इंजेक्शन दिल्याची माहिती आरोग्य विभागातील कमलेश सोनवणे यांनी दिली.


Comments
Add Comment

‘आपला दवाखान्या’चा वापर अन्य ‘उद्योगां’साठी

पगार थकला; आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रारी ठाणे  : ठाणे शहरात ४० ठिकाणी सुरू करण्यात आलेला 'आपला दवाखाना' हा

सोन्याचा हार कचऱ्यात गेला; कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोधाशोध झाली आणि अखेर...

कल्याण : सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. अशा काळात सोनं जपून ठेवणं

दोन वर्षीय चिमुकलीवर गुन्हा दाखल; पोलिसांवर प्रश्नचिन्ह

कल्याण : कल्याणनजीक असलेल्या मोहने येथे फटाके फोडण्याच्या वादातून काल दोन गटात झालेल्या राड्याप्रकरणी एका दोन

कल्याण ते नवी मुंबई मेट्रो प्रवास ४५ मिनिटांत होणार!

मुंबई : मुंबईसह सर्व उपनगरात मेट्रोचे जाळे पसरले आहे. काही प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे तर काही मेट्रो प्रकल्प

Mira Road News : मुंबईजवळच्या मीरा रोडमध्ये पुन्हा हिंसाचार! 'पार्किंग'च्या किरकोळ वादातून ३० वाहनांची तोडफोड; परिसरात तणाव

मीरा रोड : मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड (Mira Road) परिसरात पुन्हा एकदा एका किरकोळ वादावरून परिस्थिती चिघळल्याची

काशिमीरा परिसरात मोठा राडा, २५ रिक्षांचे नुकसान, मुलींची छेडछाड; मंत्री प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली बांगलादेशींच्या सहभागाची शंका

ठाणे : राज्यभरात दिवाळीचा जल्लोष सुरू असताना ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मीरा रोडजवळील