Supreme Court : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर १२ डिसेंबरला सर्वोच्च सुनावणी

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) विशेष खंडपीठासमोर प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर १२ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. या कायद्यानुसार, १५ ऑगस्ट १९४७ रोजी म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा अस्तित्वात असलेल्या सर्व प्रार्थनास्थळांची यथास्थिती राखणे अनिवार्य आहे.


२०२०, पासून न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या या खटल्याच्या सुनावणीसाठी भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी विशेष तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना केली आहे. या खंडपीठात सरन्यायाधीश यांच्यासमवेत न्यायमूर्ती पी. व्ही. संजय कुमार आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांचा समावेश आहे. १२ डिसेंबरला दुपारी साडेतीन वाजता या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.


प्रार्थनास्थळ कायदा कायदा हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख धर्मियांची प्रार्थनास्थळे आणि तीर्थक्षेत्रांची डागडुजी करण्याचा अधिकार काढून घेतो, असा युक्तीवाद याचिकांमध्ये करण्यात आला आहे. काशी राजघराण्यातील कन्या, महाराजा कुमारी कृष्णा प्रिया, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी, माजी खासदार चिंतामणी मालवीय, निवृत्त लष्करी अधिकारी अनिल कबोत्रा, वकील चंद्र शेखर रुद्र, वाराणसीचे रहिवासी विक्रम सिंह, स्वामी जितेंद्रनंद सरस्वती, देवकीनंदन ठाकूर, अश्विनी उपाध्याय यांनी या कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.



हा कायदा धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांचे आणि कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करतो, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. हा कायदा त्यांना त्यांची प्रार्थनास्थळे आणि तीर्थक्षेत्रे व्यवस्थापित करण्याचा अर्थात व्यवस्थापनाचा, देखरेखीचा आणि प्रशासनाचा अधिकार हिरावून घेतो, असाही युक्तीवाद याचिकाकर्त्यांनी केला आहे.


कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांव्यतिरिक्त, त्याचे समर्थन करणाऱ्या याचिका आणि कायद्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी निर्देश देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवरही सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) सुनावणी करणार आहे. हा खटला यापूर्वी ५ डिसेंबरला सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्यात आला होता. परंतु वेळेअभावी त्यावर सुनावणी होऊ शकली नाही.

Comments
Add Comment

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे

बिलासपूरमध्ये भूस्खलनाचा भीषण अपघात; बसवर दरड कोसळल्याने १५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, बचाव कार्य सुरू

बिलासपूर: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर