Mayawati : बांगलादेशातील हिंदू अत्याचारावर मौन बाळगणा-या सपा आणि काँग्रेसवर मायावतींचा हल्लाबोल

लखनऊ : बांगलादेशातील हिंदूंवर (Bangladesh Hindu) होत असलेला अत्याचार आणि संभलमधील हिंसाचार प्रकरणी (Sambhal Masjid Controversy) मौन बाळगणा-या सपा आणि काँग्रेसवर बहुजन समाज पक्षाच्या (BSP) प्रमुख मायावती (Mayawati) यांनी जोरदार हल्लाबोल केला.


मायावती यांनी शनिवारी बोलताना आरोप केला की काँग्रेस बांगलादेशविषयक मुद्यावर मौन बाळगून मुस्लिम मतांच्या पाठीशी उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे.



मायावती म्हणाल्या, "सपा आणि काँग्रेस दोन्ही पक्ष संभलमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर मुस्लिम मतदारांना खुश करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काँग्रेस, सपा आणि त्यांचे समर्थक या मुद्द्यावर एकाच माळेचे मणी आहेत. अशा परिस्थितीत भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पुढे जाऊन आपली जबाबदारी पार पाडावी, ज्यामुळे शोषित दलित वर्गाला आणखी त्रास सहन करावा लागणार नाही."


मायावती यांनी केंद्र सरकारने बांगलादेश सरकारशी संवाद साधून तिथून भारतीयांना भारतात परत आणण्याची मागणी केली. त्या पुढे म्हणाल्या, "संसदेतील विरोधी पक्ष राष्ट्रीय आणि जनहिताचे मुद्दे उचलण्याऐवजी, संभलमधील हिंसाचाराचा मुद्दा उचलून मुस्लिम मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत, विशेषतः सपा आणि काँग्रेस पक्ष. त्यांना इतर कोणत्याही मुद्द्यांशी काहीही संबंध नाही."


त्यांनी आरोप केला की, संभलमध्ये या पक्षांनी मुस्लिम समाजात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. "मुस्लिम समाजाला सजग राहायला लागेल. हेच नाही, तर दलित वर्गाच्या खासदारांना संसदेत आणणारे लोक, त्यांच्या पक्षाच्या नेत्याला खुश करण्यासाठी दलित अत्याचारावर मौन राखत आहेत. ही एक शोकांतिका आहे," अशी टीका मायावती (Mayawati) यांनी केली.

Comments
Add Comment

Mumbai-Ahmedabad Bullet Train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार? रेल्वेमंत्र्यांनी दिली मोठी अपडेट

मुंबई : भारताच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत मोठी आणि दिलासादायक माहिती समोर आली

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या फ्रान्स दौऱ्याला सुरुवात; नीसमध्ये भारतीय समुदायाकडून जल्लोषात स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शनिवारी फ्रान्सच्या अधिकृत दौऱ्यावर नीस शहरात दाखल झाले. फ्रान्सचे

Drone-based postal delivery : हिमाचलमध्ये ड्रोनद्वारे टपाल वितरणाची चाचणी यशस्वी

मंडी : हिमाचल प्रदेशात आता ड्रोनने घरोघरी टपाल पोहोचेल. या दिशेने भारतीय टपाल विभागाने मंडी येथे यशस्वी चाचणी

Indian Army Chief : लेफ्टनंट जनरल धीरज सेठ नवे लष्करप्रमुख

नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल धीरज सेठ आता देशाचे नवे ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ’ अर्थात लष्करप्रमुख असणार आहेत.

Indian Air Force AN-32 Plane Crashes : आसाममध्ये हवाई दलाच्या AN-३२ विमानाचा भीषण अपघात; पायलटसह ५ जवान शहीद, सहवैमानिक गंभीर जखमी

आसाम : आसाममधील जोरहाट येथील भारतीय हवाई दलाच्या एअरफोर्स स्टेशनवर शनिवारी सकाळी झालेल्या AN-३२ मालवाहू

Defence Minister Rajnath Singh : “पाकिस्तानला पाण्याचा एक थेंबही मिळणार नाही”; सिंधू जल करारावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा कडक इशारा

हैदराबाद : भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या