Pigeon Feeding : पारव्यांना खाऊ देताय, सावधान! बसेल मोठा फटका

  153

महापालिका ठोठावणार ५ हजार रुपये दंड


पुणे : अनेक पक्षीप्रेमींना पक्ष्यांना खायला देणे आवडते. मात्र आता हीच आवड महागात पडण्याची मोठी शक्यता आहे. अनेक ठिकाणी पारव्यांना (कबुतर) खाद्य म्हणून पोतेच्या पोते धान्य टाकले जाते. परंतु यामुळे पारव्यांंना श्‍वसनाचा आजार होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुणे महापालिका अॅक्शन मोडवर आली आहे. त्यामुळे आता यापुढे अशा प्रकारे खाद्यपदार्थ, धान्य टाकणाऱ्यांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.



पुणे शहरामध्ये गेल्या काही वर्षापासून पारव्यांचे प्रमाण वाढले आहे. या पारव्यांच्या पिसांमुळे आणि विष्ठेतील जंतूंमुळे हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया या आजाराची लागण नागरिकांना होत आहे. हा रोग फुफ्फुसाशी संबंधित आहे.शहरातील चौकाचौकात, महत्त्वाच्या रस्त्यावर, नदीपात्र यासह अन्य ठिकाणी पारव्यांना खाद्य पदार्थ, धान्य टाकण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.


त्यामुळे हा सर्व प्रकार पाहता घनकचरा विभागाकडून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण केल्याचा ठपका ठेवून नागरिकांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या