Weather Update : राज्यात थंडीचा जोर कमी; काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता

८ डिसेंबरनंतर राज्यात पुन्हा थंडी वाढणार


मुंबई : राज्यात थंडीचा जोर कमी झाला असून तापमानात (Weather Update) थोडी वाढ झाली आहे. मुंबई, ठाणे, उपनगर व नवी मुंबईत देखील थंडी कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत थंडी कमी झाल्याचे अनुभवायला मिळाले. राज्यात थंडी कमी झालेली असताना आता पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे. राज्याच्या काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ३ आणि ४ नोव्हेंबर रोजी देखील पावसाचा जोर वाढणार असून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्य़ा व तामिळनाडूसह देशातील प्रामुख्यानं दक्षिण किनारपट्टी क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम करणाऱ्या फेंगल या चक्रीवादळामुळे राज्यात पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले. चक्रीवादळामुळं तयार झालेले बाष्पयुक्त वारे सध्या थेट राज्याच्या दिशेनं येत असल्यामुळं पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. राज्यात काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार फेंगल चक्रीवादळाचा समुद्रकिनारपट्टीलगतच्या भागांवर परिणाम होणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या आणि परवा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, घाटमाथा भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवत या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.


यासोबतच लातूर, धाराशीव आणि नांदेड या जिल्ह्यात देखील पुढील तीन दिवस हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. ५ डिसेंबर रोजी पुन्हा पावसाचा जोर कमी होणार असून रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, कोल्हापूर, घाटमाथा, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशीवमध्ये या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


राज्यात पावसाची शक्यता असली तरी थंडी कमी (Weather Update) होणार नाही. उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम राहणार आहे. चक्रीवादळाचा परिणाम कमी झाल्यावर ८ डिसेंबरनंतर राज्यात पुन्हा एकदा थंडी वाढणार आहे. करण देशाच्या उत्तरेकडील राज्य व अतीव उत्तरेकडे असणाऱ्या बर्फाच्छादित हिमशिखरांवर पश्चिमी झंझावात सक्रीय झाला आहे. या भागात हिमवृष्टीला सुरुवात झाली असून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे गारठा वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे

Jejuri Dussehra : मर्दानी दसऱ्याची सांगता! फक्त ४ मिनिटांत ९० वेळा फिरवली ४२ किलो वजनाची खंडा तलवार

जेजुरी : कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर आज 'खंडा स्पर्धे'ने मर्दानी दसरा उत्सवाची सांगता झाली. या