Chinchpokli Accident : ट्रकच्या चाकाखाली येऊन डिलिव्हरी बॉयचा मृत्यू, मुंबईतील चिंचपोकळी येथील घटना

मुंबई : चिंचपोकळी रेल्वे स्थानकाजवळील संत ज्ञानेश्वर पुलावर ट्रकच्या चाकाखाली येऊन डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला. ही घटना (Chinchpokli Accident) सोमवारी (२५ नोव्हेंबर) दुपारी २.१५ च्या सुमारास घडली. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शंकरप्पा असे मृत्यू झालेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव असून तो धारावी येथील रहिवासी आहे. शंकरप्पा हा इडलीची डिलिव्हरी देण्यासाठी ॲक्टिव्हा स्कूटरवरून चिंचपोकळी पुलावरून लालबागच्या दिशेने जात एका वळणावर त्याचा तोल गेला आणि ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला.



या घटनेनंतर ट्रक चालकाने मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर रात्री उशीरा त्याने स्वत:ला काळाचौकी पोलिसांच्या स्वाधीन केले.


मिळालेल्या माहितीनुसार, धम्म प्रसाद (वय, ५०) असे अटक झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. प्रसाद हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून गेल्या ३५ वर्षांपासून मुंबईत काम करतो. अपघाताच्या वेळी (Chinchpokli Accident) तो रिकामा ट्रक दारूखान्याच्या दिशेने चालवत होता. या घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Comments
Add Comment

कबुतरांना दाणे घालणं पडलं महागात! बसला हजारोंचा दणका

मुंबई: कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई

New Year News Rules : नवं वर्ष, नवे नियम! १ जानेवारीपासून तुमचे आर्थिक गणित बदलणार; २०२६ मध्ये लागू होणारे 'हे' १० मोठे बदल!

मुंबई : वर्ष २०२५ ला निरोप देण्यासाठी आता अवघे ४ दिवस उरले असून, १ जानेवारी २०२६ पासून आपल्या दैनंदिन जीवनातील

कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शासकीय सदनिकांचे वाटप

मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय निवासस्थान वाटपावरून येणाऱ्या तक्रारींची

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल मुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य

पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे; ते नावाआधी लावता येणार नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी

राज्यात जनसुरक्षा कायदा लागू

अध्यादेश जारी; कडव्या डाव्या संघटनांवर होणार कारवाई मुंबई : बहुचर्चित जनसुरक्षा कायदा अखेर राज्यात लागू झाला