Chinchpokli Accident : ट्रकच्या चाकाखाली येऊन डिलिव्हरी बॉयचा मृत्यू, मुंबईतील चिंचपोकळी येथील घटना

मुंबई : चिंचपोकळी रेल्वे स्थानकाजवळील संत ज्ञानेश्वर पुलावर ट्रकच्या चाकाखाली येऊन डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला. ही घटना (Chinchpokli Accident) सोमवारी (२५ नोव्हेंबर) दुपारी २.१५ च्या सुमारास घडली. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शंकरप्पा असे मृत्यू झालेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव असून तो धारावी येथील रहिवासी आहे. शंकरप्पा हा इडलीची डिलिव्हरी देण्यासाठी ॲक्टिव्हा स्कूटरवरून चिंचपोकळी पुलावरून लालबागच्या दिशेने जात एका वळणावर त्याचा तोल गेला आणि ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला.



या घटनेनंतर ट्रक चालकाने मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर रात्री उशीरा त्याने स्वत:ला काळाचौकी पोलिसांच्या स्वाधीन केले.


मिळालेल्या माहितीनुसार, धम्म प्रसाद (वय, ५०) असे अटक झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. प्रसाद हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून गेल्या ३५ वर्षांपासून मुंबईत काम करतो. अपघाताच्या वेळी (Chinchpokli Accident) तो रिकामा ट्रक दारूखान्याच्या दिशेने चालवत होता. या घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Comments
Add Comment

‘क्लच चेस’मध्ये गुकेशचा हिकारू नाकामुरावर पलटवार

मुंबई  : ‘चॅम्पियन्स शोडाउन’ या प्रतिष्ठित रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय विश्वविजेता डी.

महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी वातावरण पोषक

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन मुंबई  : राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती, पुनर्वापर आणि

कबुतरखान्यांसाठी महापालिकेकडून पर्यायी जागांचा शोध

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा शोध घेऊन मुंबई

बेस्टच्या १५७ नव्या वातानुकूलित बसगाड्यांचे लोकार्पण

बेस्टला सक्षम करण्याचे राज्य सरकारचे ध्येय मुंबई : 'जोपर्यंत बेस्ट उपक्रम ४० टक्क्यांपर्यंत बस

जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टसचा महाराष्ट्रासोबत करार

देशातले पहिले राज्य; २ अब्ज डॉलरची गुंतवणूक मुंबई : जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टस ग्रुपचा महाराष्ट्र

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी मुदत कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी - तटकरे

मुंबई : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ