Maharashtra Assembly Election: निवडणूक प्रचारादरम्यान गोविंदाची तब्येत बिघडली,रोड शो मध्येच सोडून मुंबईत परतला

मुंबई: बॉलिवूडचा हिरो नंबर वन गोविंदा गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेत होता. खरंतर अभिनेत्याच्या पायाला गोळी लागली होती. या कारणामुळे त्याचे ऑपरेशन झाले होते. आता अभिनेता ठीक होऊन फिल्डमध्ये परतला आहे. गोविंदाची तब्येत पुन्हा बिघडली आहे. खरंतर गोविंदा महाराष्ट्रात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीतील(Maharashtra Assembly Election) एका रोड शोमध्ये पोहोचला होता. येथे त्याला अचानक छातीत दुखू लागले. यामुळे तो मुंबईत परतला आहे. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



रोड शोसाठी जळगावला पोहोचला होता गोविंद


खरंतर माजी खासदार असलेला गोविंदने नुकताच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. यामुळे ते शिवसेनेच्या उमेदवारांसाठी प्रचार करत होा. नुकताच तो जळगावात एका रोड शोसाठी पोहोचला होता. यामुळे त्याने पक्षाचा उत्साह वाढवला. मात्र अचानक अभिनेत्याची तब्येत बिघडली.



तब्येत बिघडल्यानंतर मुंबईत परतला गोविंदा


गोविंदाला अचानक तब्येत बिघडल्याने त्याला रोड शो मध्येच सोडावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता मुंबईत परतला आहे. या रोड शो दरम्यान गोविंदाने मतदारांना आवाहन केले की त्यांनी राज्यात महायुतीला मतदान करावे.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन

Maharashtra Weather Updates : स्वेटर बाहेर काढा! वीकेंडला मुंबईकर गारठणार, पारा घसरला; थंडीचा जोर वाढल्याने 'हुडहुडी' भरणार, कसं असेल राज्याचं हवामान?

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर, आता महाराष्ट्रासह संपूर्ण

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तुमच्या मार्गावरही आहे का?

मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. १६

सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल