Maharashtra Assembly Election: निवडणूक प्रचारादरम्यान गोविंदाची तब्येत बिघडली,रोड शो मध्येच सोडून मुंबईत परतला

मुंबई: बॉलिवूडचा हिरो नंबर वन गोविंदा गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेत होता. खरंतर अभिनेत्याच्या पायाला गोळी लागली होती. या कारणामुळे त्याचे ऑपरेशन झाले होते. आता अभिनेता ठीक होऊन फिल्डमध्ये परतला आहे. गोविंदाची तब्येत पुन्हा बिघडली आहे. खरंतर गोविंदा महाराष्ट्रात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीतील(Maharashtra Assembly Election) एका रोड शोमध्ये पोहोचला होता. येथे त्याला अचानक छातीत दुखू लागले. यामुळे तो मुंबईत परतला आहे. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



रोड शोसाठी जळगावला पोहोचला होता गोविंद


खरंतर माजी खासदार असलेला गोविंदने नुकताच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. यामुळे ते शिवसेनेच्या उमेदवारांसाठी प्रचार करत होा. नुकताच तो जळगावात एका रोड शोसाठी पोहोचला होता. यामुळे त्याने पक्षाचा उत्साह वाढवला. मात्र अचानक अभिनेत्याची तब्येत बिघडली.



तब्येत बिघडल्यानंतर मुंबईत परतला गोविंदा


गोविंदाला अचानक तब्येत बिघडल्याने त्याला रोड शो मध्येच सोडावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता मुंबईत परतला आहे. या रोड शो दरम्यान गोविंदाने मतदारांना आवाहन केले की त्यांनी राज्यात महायुतीला मतदान करावे.

Comments
Add Comment

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि