Hutatma Express: हुतात्मा एक्स्प्रेसला जोडले जाणार तीन जनरल डबे

सोलापूर: सोलापूर-पुणे रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या सोलापूरकर प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे हुतात्मा एक्स्प्रेसमधून रिझर्व्हेशन न करता ऐनवेळी जनरल तिकीट काढून प्रवास करता येणार आहे. तीन आरक्षित डब्यात बदल करून त्याऐवजी तीन डबे जनरल असतील. यातून सर्वसामान्य २३५ प्रवाशांना अनारक्षित (जनरल) तिकिटावर प्रवास करता येणार आहे. येत्या २१ नोव्हेंबरपासून सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेसला हा निर्णय लागू होणार असून, सोलापूरहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.



कोरोनाकाळात रेल्वेने मेल एक्स्प्रेस गाड्यांतील साधारण डब्याची संख्या एक आणि दोन करण्यात आलेली होती. तसेच हुतात्माला जनरल डबा नसल्यामुळे वेटींग तिकीट असलेल्या आणि अचानक प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. पण, जनरल डबे घोषित केल्यामुळे दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हुतात्मा एक्स्प्रेला साधारण डब्यांची संख्या वाढवण्यासाठी सातत्याने मागणी होत होती. अखेर ती मागणी रेल्वे प्रशासनाने पूर्ण केली आहे.
Comments
Add Comment

पुण्यात पसरला विषारी धूर, ५ विद्यार्थी रुग्णालयात; २० हजार विद्यार्थ्यांच्या कॉलेजला सुट्टी, एक कंपनी बंद

पुणे : पुण्यात लोणी काळभोर परिसरात मुळा-मुठा नदीपात्रात निमयित मोठ्या प्रमाणात कचरा टाकून तो जाळला जात आहे. या

Nagpur Blast : नागपूर कारखाना स्फोट; पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

नागपूर येथील कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला, आणि

Holi 2026 : रंग-पिचकाऱ्यांच्या किंमतीत सरासरी पाच टक्के वाढ, तरीही खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा रंगांनी न्हाऊन निघाल्या आहेत.

Pune: धक्कादायक! पुण्यात महिलेची गर्भाशयाची गाठ काढण्याऐवजी डॉक्टरांनी...

पुणे: पुण्यातील मांजरी परिसरातील एका खासगी रुग्णालयातून वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

Nagpur Blast : काटोलमध्ये स्फोटक कारखान्यात भीषण दुर्घटना; १२ ठार, १५ जखमी

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या SBL कंपनीत १ मार्च रविवारी सकाळी सुमारे ७

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या