Share Market Holiday : विधानसभा निवडणूक मतदानादिवशी शेअर बाजाराला सुट्टी!

मुंबई : महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी राज्यभरातील २८८ विधानसभा मतदारसंघात मतदान (Assembly Election Voting) पार पडणार आहे. या दिवशी उद्योग विभागांतर्गत येणार्‍या सर्व आस्थापनांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता भारतीय शेअर बाजार (Share Market) देखील बंद राहणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मतदानादिवशी म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी स्टॉक मार्केटमध्ये बीएसई आणि एनएसईवरील सर्व कामकाज बंद असणार आहे. याशिवाय करन्सी मार्केट आणि कमोडिटी एक्सचेंजला देखील सुट्टी देण्यात आली आहे. याबाबतचे नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे.



नोव्हेंबर महिन्यात १२ दिवस शेअर बाजार बंद


नोव्हेंबर महिन्यात एकूण १२ दिवस शेअर बाजार बंद राहणार आहे. यामध्ये दिवाळी आणि इतर सणानिमित्त सुट्ट्यांचा समावेश आहे. १ नोव्हेंबरला दिवाळीनिमित्त, १५ नोव्हेंबरला गुरुनानक जयंतीनिमित्त तर २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीनिमित्त सुट्टी असेल. तसेच नोव्हेंबरमधील शनिवार आणि रविवार मिळून १२ दिवस सुट्टी राहील. (Share Market Holiday)

Comments
Add Comment

मालेगावच्या बालिकेवर अत्याचार, सर्वत्र संताप; अभिनेत्री सुरभी भावेकडून कठोर शिक्षेची मागणी

मालेगाव : मालेगावजवळील डोंगराळे गावात घडलेल्या निर्घृण घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. साडेतीन

राज्यभरातील व्यापाऱ्यांचा ५ डिसेंबरला लाक्षणिक बंद

पुणे (प्रतिनिधी) : राज्यभरातील व्यापारी विविध मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ५ डिसेंबर २०२५ रोजी

धक्कादायक प्रकार, पुण्यात १६ जेष्ठ नागरिकांना उघड्यावर टाकले

पुणे : पुण्यातील सामाजिक सुरक्षेच्या यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. शहरातील १६

ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड संस्थेत घोटाळा! सर्वसामान्यांच्या बचतीचा पदाधिकाऱ्यांनी घेतला फायदा

अकोला: अकोल्यातली ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड या संस्थेमध्ये ठेवी केलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक

Leopard Conflict : 'गोळी' की 'नसबंदी'? बिबट्याला पकडण्यासाठी सरकारचा मास्टरस्ट्रोक! तब्बल 'इतक्या' कोटींचा खर्च करणार अन्...

जुन्नर : पुणे जिल्ह्याच्या जुन्नर (Junner) आणि उत्तर पुणे परिसरात बिबट्यांच्या (Leopard) संख्येत सातत्याने वाढ होत आहे,

Satbara Utara : ऐतिहासिक निर्णय! ६० लाख कुटुंबांना मोठा दिलासा; भूखंड विनाशुल्क नियमित करण्याचे राज्य सरकारचे निर्देश, ३ कोटी नागरिकांना थेट लाभ

मुंबई : राज्यातील नागरिकांसाठी एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. तुकडेबंदी