Share Market Holiday : विधानसभा निवडणूक मतदानादिवशी शेअर बाजाराला सुट्टी!

मुंबई : महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी राज्यभरातील २८८ विधानसभा मतदारसंघात मतदान (Assembly Election Voting) पार पडणार आहे. या दिवशी उद्योग विभागांतर्गत येणार्‍या सर्व आस्थापनांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता भारतीय शेअर बाजार (Share Market) देखील बंद राहणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मतदानादिवशी म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी स्टॉक मार्केटमध्ये बीएसई आणि एनएसईवरील सर्व कामकाज बंद असणार आहे. याशिवाय करन्सी मार्केट आणि कमोडिटी एक्सचेंजला देखील सुट्टी देण्यात आली आहे. याबाबतचे नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे.



नोव्हेंबर महिन्यात १२ दिवस शेअर बाजार बंद


नोव्हेंबर महिन्यात एकूण १२ दिवस शेअर बाजार बंद राहणार आहे. यामध्ये दिवाळी आणि इतर सणानिमित्त सुट्ट्यांचा समावेश आहे. १ नोव्हेंबरला दिवाळीनिमित्त, १५ नोव्हेंबरला गुरुनानक जयंतीनिमित्त तर २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीनिमित्त सुट्टी असेल. तसेच नोव्हेंबरमधील शनिवार आणि रविवार मिळून १२ दिवस सुट्टी राहील. (Share Market Holiday)

Comments
Add Comment

'UP पॅटर्न'चा धसका! नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या 'बुलडोझर ॲक्शन'ची जोरदार चर्चा

अवैध बांधकामे, गुन्हेगारी अड्डे जमीनदोस्त; "गुन्हेगारांना माफी नाही, कायदा सर्वांसाठी समान" – मुख्यमंत्र्यांचे

Maharashtra Weather Update : पुढील ७२ तासांत राज्यावर कोणते मोठे संकट? प्रशासनाचा स्पष्ट इशारा; 'अति महत्वाचं काम' म्हणजे नेमकं काय?

काही दिवसांपूर्वीच राज्यात अनेक भागांमध्ये पावसाचा मोठा कहर आणि अतिवृष्टी अनुभवल्यानंतर, आता भारतीय हवामान

Devendra Fadanvis : ब्रेकिंग पुणे! केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्र्यांच्या मंचावर सापाचा शिरकाव; सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ

पुणे : पिंपरी-चिंचवडजवळच्या किवळे (Kiwale) येथील सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये आज दुहेरी

गुन्हेगारी स्टाईलने 'रिल्स' बनवणा-याला दिला पोलिसांनी दणका

पुणे : दिवाळीच्या उत्सवात सोशल मीडियावर विविध प्रकारच्या जाहिराती येत असतात. अनेकजण आपल्या व्यवसायाच्या

ई-केवायसीसाठी लाडक्या बहिणींसमोर अडचणींचा डोंगर!

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेला ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले

पूरग्रस्त सोलापूर आणि बीड जिल्ह्यांसाठी रिलायन्स फाउंडेशनकडून मदतीचा हात

सोलापूर : मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि बीड जिल्ह्यांतील पूरस्थितीमुळे त्रस्त झालेल्या सुमारे चार हजार