Share Market Holiday : विधानसभा निवडणूक मतदानादिवशी शेअर बाजाराला सुट्टी!

  116

मुंबई : महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी राज्यभरातील २८८ विधानसभा मतदारसंघात मतदान (Assembly Election Voting) पार पडणार आहे. या दिवशी उद्योग विभागांतर्गत येणार्‍या सर्व आस्थापनांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता भारतीय शेअर बाजार (Share Market) देखील बंद राहणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मतदानादिवशी म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी स्टॉक मार्केटमध्ये बीएसई आणि एनएसईवरील सर्व कामकाज बंद असणार आहे. याशिवाय करन्सी मार्केट आणि कमोडिटी एक्सचेंजला देखील सुट्टी देण्यात आली आहे. याबाबतचे नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे.



नोव्हेंबर महिन्यात १२ दिवस शेअर बाजार बंद


नोव्हेंबर महिन्यात एकूण १२ दिवस शेअर बाजार बंद राहणार आहे. यामध्ये दिवाळी आणि इतर सणानिमित्त सुट्ट्यांचा समावेश आहे. १ नोव्हेंबरला दिवाळीनिमित्त, १५ नोव्हेंबरला गुरुनानक जयंतीनिमित्त तर २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीनिमित्त सुट्टी असेल. तसेच नोव्हेंबरमधील शनिवार आणि रविवार मिळून १२ दिवस सुट्टी राहील. (Share Market Holiday)

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या