महाविकास आघाडीचा घोषणांचा पाऊस, महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार रूपये

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. यातच बुधवारी महाविकास आघाडीने आपल्या पाच घोषणा जाहीर केल्या आहेत. यात महिलांना दर महा आर्थिक साहाय्य, कुटुंबासाठी आरोग्य विमा यांचा समावेश आहे.


खरंतर, महाविकास आघाडीमध्ये सामील पक्ष-काँग्रेस, शिवसेना(उद्धव ठाकरे), एनसीपी(शरद पवार) या नेत्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान सभेचे आयोजन केले. यात सर्व नेते सामील झाले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या दरम्यान निवडणुकीसाठी आपले संकल्प पत्र जारी केले आहे.



या आहेत पाच घोषणा


महालक्ष्मी - महिलांना दरमहा ३ हजार रूपयांचे आर्थिक सहाय्य मिळेल. संपूर्ण महाराष्ट्रात सरकारी वाहनांमध्ये मोफत प्रवास.


कृषी समृद्धी - संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे ३ लाखांपर्यंतचे कृषी कर्ज माफ केले जाईल. याशिवाय सातत्याने कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रूपयांचा प्रोत्साहन भत्ता दिला जाईल.


युवकांना शब्द - महाराष्ट्रातील दर बेरोजगार तरुणांना दरमहा ४ हजार रूपयांचे मासिक सहाय्य प्रदान केले जाईल.


कुटुंब रक्षण - महाराष्ट्रातील सर्व कुटुंबांना २५ लाख रूपयांचा आरोग्य विमान प्रदान केला जाईल. सरकारी रुग्णालयात आवश्यक औषधे मोफत प्रदान केली जातील.


समानतेची हमी - महाराष्ट्रात सामाजिक-आर्थिक जाती जनगणना आयोजित केली जाईल.



२० नोव्हेंबरला होणार मतदान


महाराष्ट्रात यंदा २८८ विधानसभेच्या जागांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेनेला ५६, एनसीपीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या.

Comments
Add Comment

गोरेगाव मुलुंड पश्चिमेतील उड्डाणपूल प्रकल्पाला गती, मुंबई मेट्रो ४च्या खालून जाणार पूल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पूल येथपर्यंतचा १.८९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल

महापालिकेच्या आपला दवाखान्यामध्येही मुख कर्करोगाची तपासणी

गर्भाशय मुख आणि स्तन कर्करोगाचे दवाखान्यांसह प्रसुतीगृहांमध्ये तपासणी शिबीर मुंबई (विशेष प्रतिनिधी)

गोरेगावात लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा स्फोट; तीन जण थोडक्यात बचावले

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांमुळे मोठा धोका निर्माण झाल्याची घटना समोर आली

भारतीय कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये

अंदाजपत्रकातून विकासाला गती येण्यासाठी आणखी काही ठोस पावलांची अपेक्षा बारामती : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत

शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल

राज्य सरकारचा निर्णय; कागल आणि हातकणंगलेचा भाग वगळला मुंबई : राज्यातील साडेतीन शक्तीपीठांना जोडणाऱ्या

Pune Mumbai Expressway News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस गळतीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला, पहाटेपर्यंत बचावकार्य सुरू

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपासून सुरू झालेला वाहतुकीचा खोळंबा तब्बल १२