मुंबई: मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी इंदोर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे घराबाहेर रांगोळी काढणाऱ्या दोन मुलींना कारने चिरडले. यात दोघीही गंभीर जखमी झाल्या आहेत. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, दोघांचीही स्थिती गंभीर आहे.
ही घटना सोमवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळेस मुली आपल्या घराबाहेर दिवाळीच्या सणासाठी रांगोळीची तयारी करत होत्या. त्याच वेळेस वेगवान कारने त्यांना चिरडले. स्थानिक लोकांनी कार तोडली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीची ओळख केली. सोबतच पोलिसांनी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दुर्घटनेची सूचना मिळताच एरोड्रम पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी घटनास्थळाचे निरीक्षण केले आणि जखमी मुलींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सोबतच पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे. दोन्ही मुलींची तब्येत गंभीर आहे. यातील एक मुलगी १९ वर्षांची आहे तर एक १३ वर्षांची मुलगी आहे.
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…