काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर

  84

कणकवली : संजय राऊत काँग्रेस आणि उबाठामधील वादाबद्दल कितीही खोटे बोलत असले तरी आघाडीत बिघाडी झाली आहे हे जगजाहीर आहे. येत्या ४८ तासांमध्ये काँग्रेस पक्ष महत्वाचा निर्णय घेण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मोठा भूकंप होणार आहे. काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे, असा गौप्यस्फोट भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी केला. कणकवलीत प्रहार भवन येथे पत्रकारांशी बोलत होते.


दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरळ सरळ नाराजीची भूमिका घेतली. मिटिंगमधून उठून ते गेले. विदर्भ कोकण आणि मुंबईतल्या काही जागांबद्दल उद्धव ठाकरे हे परस्पर पक्षाचे एबी फॉर्म वाटत आहेत. त्याबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळेच पुढच्या दोन दिवसांमध्ये काँग्रेस आपली भूमिका घेईल अशा सरळ स्पष्ट राज्यांच्या नेत्यांना कळविलेला आहे, अशी आमच्याकडे माहिती आहे. म्हणून महाविकास आघाडी शेवटचे काही तासाचे राहणार आहे. महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे कोणालाही न विचारता कोणालाही न सांगता कोणालाही न विश्वासात घेता, ए बी फॉर्म वाटताहेत. ज्या जागेवर अजूनपर्यंत चर्चा फायनल झालेले नाही. उदाहरण भायखळा, हिंगोली, देवळाली हे मतदार संघ कोणत्या पक्षाला द्यायचे याचा निर्णय झालेला नाही.


असे अजून कितीतरी मतदार संघ आहेत. ही चार नावे उदाहरण म्हणून दिली. त्या जागेवर अजूनपर्यंत आघाडी म्हणून निर्णय झालेला नाही. तरीही उद्धव ठाकरेंनी त्याचे एबी फॉर्म आपल्या पक्षाच्या उमेदवारांना दिले आहेत. म्हणजे काँग्रेसला फाट्यावर मारण्याचे काम उद्धव ठाकरे सरळ स्पष्ट करतात. त्यामुळे काँग्रेसचे नेते मंडळी उद्धव ठाकरे यांच्या बद्दल कुठल्या शब्दात खाजगीमध्ये चर्चा करत आहेत. काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर निघण्याचा निर्णय ९० टक्के झालेला आहे आणि काँग्रेसचे अस्तित्व संपवायचा जो विडा उद्धव ठाकरेंनी उचलला त्याबद्दल राहुल गांधीजींना प्रचंड राग आलेला आहे. त्या पद्धतीची भूमिका लवकरच काँग्रेस घेणार आहे, अशी खात्रीलायक माहिती आहे.

Comments
Add Comment

रामायण: द इंट्रोडक्शन सिनेमा बॉक्स ऑफिसवर मैलाचा दगड ठरणार का?... नऊ शहरांचं उद्या पहिल्या लूककडे लक्ष..

रामायण हे आपल्या सनातन हिंदू संस्कृतीत अतिशय महत्वाच मानलं जात. रामायणातील विविध कथांचं वाचन आणि अध्ययन करून

वीज कोसळण्याचे अलर्ट देणारे अ‍ॅप

मुंबई : वीज कोसळून दरवर्षी अनेक शेतकऱ्यांचे आणि शेतमजुरांचे मृत्यू होतात. यावर उपाय म्हणून वीज कोसळणार असल्याची

कमी खर्चाच्या, नाविन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांची समृद्धी वाढवणे – कृषी मंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे

कृषी विभागातर्फे महाकृषी एआय धोरण कार्यशाळेचे उद्घाटन मुंबई: मानवरहित शेती, एआय-आधारित (AI Oriented) हवामान अंदाज,

शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी महत्वपूर्ण ठरतील !

कृषी आयुक्त सूरज मांढरे यांचे प्रतिपादन मुंबई: शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी हातभार

नदी, नाल्यांकडे दुर्लक्ष, नालेसफाईत कोट्यावधी खर्च

कांदिवली (वार्ताहर) : कांदिवली, चारकोप आणि बोरिवली गोराईतील खाडीकिनारी असलेली खारफुटी नामशेष होत असून, तिथे

विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष