काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर

कणकवली : संजय राऊत काँग्रेस आणि उबाठामधील वादाबद्दल कितीही खोटे बोलत असले तरी आघाडीत बिघाडी झाली आहे हे जगजाहीर आहे. येत्या ४८ तासांमध्ये काँग्रेस पक्ष महत्वाचा निर्णय घेण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मोठा भूकंप होणार आहे. काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे, असा गौप्यस्फोट भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी केला. कणकवलीत प्रहार भवन येथे पत्रकारांशी बोलत होते.


दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरळ सरळ नाराजीची भूमिका घेतली. मिटिंगमधून उठून ते गेले. विदर्भ कोकण आणि मुंबईतल्या काही जागांबद्दल उद्धव ठाकरे हे परस्पर पक्षाचे एबी फॉर्म वाटत आहेत. त्याबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळेच पुढच्या दोन दिवसांमध्ये काँग्रेस आपली भूमिका घेईल अशा सरळ स्पष्ट राज्यांच्या नेत्यांना कळविलेला आहे, अशी आमच्याकडे माहिती आहे. म्हणून महाविकास आघाडी शेवटचे काही तासाचे राहणार आहे. महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे कोणालाही न विचारता कोणालाही न सांगता कोणालाही न विश्वासात घेता, ए बी फॉर्म वाटताहेत. ज्या जागेवर अजूनपर्यंत चर्चा फायनल झालेले नाही. उदाहरण भायखळा, हिंगोली, देवळाली हे मतदार संघ कोणत्या पक्षाला द्यायचे याचा निर्णय झालेला नाही.


असे अजून कितीतरी मतदार संघ आहेत. ही चार नावे उदाहरण म्हणून दिली. त्या जागेवर अजूनपर्यंत आघाडी म्हणून निर्णय झालेला नाही. तरीही उद्धव ठाकरेंनी त्याचे एबी फॉर्म आपल्या पक्षाच्या उमेदवारांना दिले आहेत. म्हणजे काँग्रेसला फाट्यावर मारण्याचे काम उद्धव ठाकरे सरळ स्पष्ट करतात. त्यामुळे काँग्रेसचे नेते मंडळी उद्धव ठाकरे यांच्या बद्दल कुठल्या शब्दात खाजगीमध्ये चर्चा करत आहेत. काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर निघण्याचा निर्णय ९० टक्के झालेला आहे आणि काँग्रेसचे अस्तित्व संपवायचा जो विडा उद्धव ठाकरेंनी उचलला त्याबद्दल राहुल गांधीजींना प्रचंड राग आलेला आहे. त्या पद्धतीची भूमिका लवकरच काँग्रेस घेणार आहे, अशी खात्रीलायक माहिती आहे.

Comments
Add Comment

आयफोनपासून मॅकपर्यंत ‘या’ Apple उत्पादनांना निरोप

मुंबई : दरवर्षी नवीन तंत्रज्ञान आणि सुधारित मॉडेल्स बाजारात आणताना Apple काही जुनी उत्पादने बंद करत असते आणि यंदा हा

विहिरीतील मोटार काढताना काळाचा घाला; धाराशिवमध्ये बाप-लेकासह चौघांचा दुर्दैवी मृत्यू

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र

सलमान खानचा ‘बॅटल ऑफ गलवान’ — जिद्द आणि शौर्याची अढळ कहाणी

सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ — हिम्मत आणि वीरतेने सजलेली गौरवाची कहाणी, टीझर झाला रिलीज आपल्या वाढदिवसाच्या

वर्षा उसगावकर पुन्हा छोट्या पडद्यावर; दिसणार 'या' लोकप्रिय मालिकेत

मराठी सिनेविश्वातील एव्हर ग्रीन अभिनेत्री वर्षा उसगांवकर आता स्टार प्रवाहवरच्या मालिकेत दिसणार आहेत. वर्षा

आंदेकर कुटुंबिय उतरलं आगामी निवडणुकीच्या रिंगणात! कडक पोलीस बंदोबस्तात केला उमेदवारी अर्ज दाखल

पुणे: यावर्षीच्या गणपतीमध्ये झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर न्यायालयीन

शिक्षकांकडून अमानुष वागणूक; लहानग्याच्या छळाप्रकरणी पोलिसांची कारवाई

नवी मुंबई : नवी मुंबईतील कामोठे परिसरातील एका शाळेत सहा वर्षांच्या चिमुकल्याला शिक्षकांकडून अमानुष वागणूक