Weather Update : परतीच्या पावसाचा जोर ओसरला! 'या' तारखेपासून लागणार गुलाबी थंडीची चाहूल

मुंबई : काही दिवसांपासून राज्यभरात धूमाकूळ घातलेल्या परतीच्या पावसाचा (Maharashtra Rain) जोर ओसरत चालला असल्याचे दिसून येत आहे. तर अजूनही काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. मात्र हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या काही दिवसांत परतीचा पाऊस गायब होणार असून नागरिकांना गुलाबी थंडीची (Cold weather) चाहूल लागणार आहे.


येत्या आठवड्याभरात महाराष्ट्रातील काही भागात पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार असून त्यानंतर राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचे हवामान तज्ञांनी सांगितले.



कधीपासून पसरणार थंडीची चादर?


१ नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात थंडीची चादर पसरणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. तर येत्या आठवडाभरात नाशिक, जालना, संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला या भागात थंडीला सुरुवात होईल.



या कालावधीत असणार पावसाची उघडीप


उद्यापासून राज्यात पावसाची उघडीप मिळू शकते. २६ ते २९ दरम्यान दक्षिण महाराष्ट्रात ४ दिवस किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चार दिवसात दक्षिण नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर अशा १८ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवमान विभागाने वर्तवली आहे.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा