Weather Update : परतीच्या पावसाचा जोर ओसरला! ‘या’ तारखेपासून लागणार गुलाबी थंडीची चाहूल

Share

मुंबई : काही दिवसांपासून राज्यभरात धूमाकूळ घातलेल्या परतीच्या पावसाचा (Maharashtra Rain) जोर ओसरत चालला असल्याचे दिसून येत आहे. तर अजूनही काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. मात्र हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या काही दिवसांत परतीचा पाऊस गायब होणार असून नागरिकांना गुलाबी थंडीची (Cold weather) चाहूल लागणार आहे.

येत्या आठवड्याभरात महाराष्ट्रातील काही भागात पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार असून त्यानंतर राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचे हवामान तज्ञांनी सांगितले.

कधीपासून पसरणार थंडीची चादर?

१ नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात थंडीची चादर पसरणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. तर येत्या आठवडाभरात नाशिक, जालना, संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला या भागात थंडीला सुरुवात होईल.

या कालावधीत असणार पावसाची उघडीप

उद्यापासून राज्यात पावसाची उघडीप मिळू शकते. २६ ते २९ दरम्यान दक्षिण महाराष्ट्रात ४ दिवस किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चार दिवसात दक्षिण नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर अशा १८ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवमान विभागाने वर्तवली आहे.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

2 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

2 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

3 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

4 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

5 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

5 hours ago