Weather Update : परतीच्या पावसाचा जोर ओसरला! 'या' तारखेपासून लागणार गुलाबी थंडीची चाहूल

  163

मुंबई : काही दिवसांपासून राज्यभरात धूमाकूळ घातलेल्या परतीच्या पावसाचा (Maharashtra Rain) जोर ओसरत चालला असल्याचे दिसून येत आहे. तर अजूनही काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. मात्र हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या काही दिवसांत परतीचा पाऊस गायब होणार असून नागरिकांना गुलाबी थंडीची (Cold weather) चाहूल लागणार आहे.


येत्या आठवड्याभरात महाराष्ट्रातील काही भागात पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार असून त्यानंतर राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचे हवामान तज्ञांनी सांगितले.



कधीपासून पसरणार थंडीची चादर?


१ नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात थंडीची चादर पसरणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. तर येत्या आठवडाभरात नाशिक, जालना, संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला या भागात थंडीला सुरुवात होईल.



या कालावधीत असणार पावसाची उघडीप


उद्यापासून राज्यात पावसाची उघडीप मिळू शकते. २६ ते २९ दरम्यान दक्षिण महाराष्ट्रात ४ दिवस किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चार दिवसात दक्षिण नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर अशा १८ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवमान विभागाने वर्तवली आहे.

Comments
Add Comment

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून