दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा पुढील आठवड्यात घोषित होण्याची शक्यता

मुंबई: पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. दरम्यान बारावीसाठी ३० ऑक्टोबर तर दहावीसाठी १० नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

शाळा आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून हे अर्ज भरुन घेतले जात आहेत. त्यामुळे सध्या प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध विषयांच्या असाइनमेंटस् चे अहवाल सादर करण्यासोबतच परीक्षा अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय यंत्रणेने स्वतंत्र वेळापत्रक तयार करुन दिले असून त्यानुसार त्या-त्या शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना योग्य त्या सूचना निर्गमित केल्या आहेत. वर उल्लेखीत दोन्ही तारखा ह्या विना विलंब शुल्काशिवायच्या आहेत. परंतु जे विद्यार्थी या वेळांमध्ये परीक्षा अर्ज भरु शकणार नाहीत, त्यांना विलंब शुल्कासह अर्ज भरुन देण्याची मुभा देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय कार्यालयाचे कार्यक्षेत्र हे पश्चिम विदर्भाच्या पाचही जिल्ह्यात व्यापले आहे. त्यामुळे अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालये आणि दहावीच्या सर्व शाळांना मंडळातर्फे योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. दहावी, बारावीचे परीक्षा अर्ज ऑनलाईन भरावयाचे आहेत. परंतु त्यासाठी त्या-त्या जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांचे प्रशासन विद्यार्थ्यांना मदत करीत आहे. किंबहूना त्यासाठी स्वतंत्र कक्ष उघडण्यात आले असून त्याठिकाणी पूर्णवेळ शिक्षक, प्राध्यापकांची नियुक्तीही करण्यात आली आहे.



परीक्षेच्या तारखांची पुढील आठवड्यात होणार घोषणा 


दहावी-बारावीचे परीक्षा अर्ज दाखल करण्यासंदर्भात दुजोरा देत असतानाच विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष निलीमा टाके यांनी आगामी आठवड्यात या दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक घोषित होण्याची शक्यता वर्तविली आहे. पुण्यातील शिखर मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा यापूर्वीच घोषित केल्या असून त्यावर सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. राज्यभरातून अशा अनेक सूचना व हरकती शिक्षण मंडळाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार शिखर मंडळ लवकरच परीक्षांचे वेळापत्रक घोषित करेल, असे टाके यांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

निवडणुकीच्या धामधुमीत जळगावात गोळीबार!

निवडणुकीशी संबंध नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या आनंद मंगल

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह