दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा पुढील आठवड्यात घोषित होण्याची शक्यता

  125

मुंबई: पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. दरम्यान बारावीसाठी ३० ऑक्टोबर तर दहावीसाठी १० नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

शाळा आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून हे अर्ज भरुन घेतले जात आहेत. त्यामुळे सध्या प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध विषयांच्या असाइनमेंटस् चे अहवाल सादर करण्यासोबतच परीक्षा अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय यंत्रणेने स्वतंत्र वेळापत्रक तयार करुन दिले असून त्यानुसार त्या-त्या शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना योग्य त्या सूचना निर्गमित केल्या आहेत. वर उल्लेखीत दोन्ही तारखा ह्या विना विलंब शुल्काशिवायच्या आहेत. परंतु जे विद्यार्थी या वेळांमध्ये परीक्षा अर्ज भरु शकणार नाहीत, त्यांना विलंब शुल्कासह अर्ज भरुन देण्याची मुभा देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय कार्यालयाचे कार्यक्षेत्र हे पश्चिम विदर्भाच्या पाचही जिल्ह्यात व्यापले आहे. त्यामुळे अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालये आणि दहावीच्या सर्व शाळांना मंडळातर्फे योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. दहावी, बारावीचे परीक्षा अर्ज ऑनलाईन भरावयाचे आहेत. परंतु त्यासाठी त्या-त्या जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांचे प्रशासन विद्यार्थ्यांना मदत करीत आहे. किंबहूना त्यासाठी स्वतंत्र कक्ष उघडण्यात आले असून त्याठिकाणी पूर्णवेळ शिक्षक, प्राध्यापकांची नियुक्तीही करण्यात आली आहे.



परीक्षेच्या तारखांची पुढील आठवड्यात होणार घोषणा 


दहावी-बारावीचे परीक्षा अर्ज दाखल करण्यासंदर्भात दुजोरा देत असतानाच विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष निलीमा टाके यांनी आगामी आठवड्यात या दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक घोषित होण्याची शक्यता वर्तविली आहे. पुण्यातील शिखर मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा यापूर्वीच घोषित केल्या असून त्यावर सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. राज्यभरातून अशा अनेक सूचना व हरकती शिक्षण मंडळाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार शिखर मंडळ लवकरच परीक्षांचे वेळापत्रक घोषित करेल, असे टाके यांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, एसटी साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करणार...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या