दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा पुढील आठवड्यात घोषित होण्याची शक्यता

मुंबई: पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. दरम्यान बारावीसाठी ३० ऑक्टोबर तर दहावीसाठी १० नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

शाळा आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून हे अर्ज भरुन घेतले जात आहेत. त्यामुळे सध्या प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध विषयांच्या असाइनमेंटस् चे अहवाल सादर करण्यासोबतच परीक्षा अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय यंत्रणेने स्वतंत्र वेळापत्रक तयार करुन दिले असून त्यानुसार त्या-त्या शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना योग्य त्या सूचना निर्गमित केल्या आहेत. वर उल्लेखीत दोन्ही तारखा ह्या विना विलंब शुल्काशिवायच्या आहेत. परंतु जे विद्यार्थी या वेळांमध्ये परीक्षा अर्ज भरु शकणार नाहीत, त्यांना विलंब शुल्कासह अर्ज भरुन देण्याची मुभा देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय कार्यालयाचे कार्यक्षेत्र हे पश्चिम विदर्भाच्या पाचही जिल्ह्यात व्यापले आहे. त्यामुळे अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालये आणि दहावीच्या सर्व शाळांना मंडळातर्फे योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. दहावी, बारावीचे परीक्षा अर्ज ऑनलाईन भरावयाचे आहेत. परंतु त्यासाठी त्या-त्या जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांचे प्रशासन विद्यार्थ्यांना मदत करीत आहे. किंबहूना त्यासाठी स्वतंत्र कक्ष उघडण्यात आले असून त्याठिकाणी पूर्णवेळ शिक्षक, प्राध्यापकांची नियुक्तीही करण्यात आली आहे.



परीक्षेच्या तारखांची पुढील आठवड्यात होणार घोषणा 


दहावी-बारावीचे परीक्षा अर्ज दाखल करण्यासंदर्भात दुजोरा देत असतानाच विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष निलीमा टाके यांनी आगामी आठवड्यात या दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक घोषित होण्याची शक्यता वर्तविली आहे. पुण्यातील शिखर मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा यापूर्वीच घोषित केल्या असून त्यावर सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. राज्यभरातून अशा अनेक सूचना व हरकती शिक्षण मंडळाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार शिखर मंडळ लवकरच परीक्षांचे वेळापत्रक घोषित करेल, असे टाके यांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

नांदोस गढी उत्खननाची मंत्री आशिष शेलार यांच्याकडून पाहणी

सिंधुदुर्ग : नांदोस येथील शिवकालीन गढीचे पुरातत्वीय उत्खनन पुरातत्व विभागातर्फे करण्यात येत असून या उत्खननात

Minister Ashish Shelar : नांदोस गढी उत्खननाची मंत्री आशिष शेलार यांच्याकडून पाहणी

सिंधुदुर्ग दौऱ्यात आधार किट वाटप व दिक्षांत समारंभ सिंधुदुर्ग : नांदोस य

Appreciating Swadeshi : स्वदेशी सल्लागार कंपन्यांचे साह्य घेणारा कौशल्य विकास विभाग राज्यात प्रथम

स्वदेशीचा पुरस्कार करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार मुंबई : राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री

धक्कदायक! जन्मदात्या आईने 'या' कारणामुळे केली ६ वर्षीय चिमुकल्याची निर्घृण हत्या

बीड : प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यानं आईने प्रियकराच्या साथीनं चक्क ३ वर्षाच्या चिमुकल्याची पाण्यात बुडवून आणि

Why is Sharad Pawar silent on 'Urban Naxalites' : वारकरी संप्रदायातील 'अर्बन नक्षलवाद्यां'वर शरद पवार गप्प का?

नवनाथ बन यांचा सवाल; लव्ह जिहाद, लांगुलचालनावरून विरोधकांवर टीका मुंबई : "वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांची

CM Devendra Fadnavis : छगन भुजबळ हेलिकॉप्टर अपघात प्रकरणाची चौकशी होणार - मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या हेलिकॉप्टरच्या अपघाती लँडिंगबाबत