प्रहार    

Nashik News : पावसाळ्यानंतरही नाशिककरांभोवती डेंग्यूचा विळखा कायम!

  56

Nashik News : पावसाळ्यानंतरही नाशिककरांभोवती डेंग्यूचा विळखा कायम!

बाधितांचा आकडा हजारावर, १७ दिवसांतच ६६ नवे रुग्ण


नाशिक : पावसाळा संपल्यानंतरही डेंग्यूचा (Dengue) प्रकोप कायम असून, सातपूर विभागातील पाच वर्षीय बालकाचा रविवारी डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली. खासगी रुग्णालयाच्या अहवालानुसार, या बालकाला डेंग्यूचे निदान झाले होते. त्यामुळे वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर आला असून, वैद्यकीय विभागाच्या पथकाने या बालकाच्या घरी धाव घेत परिसरात औषध, तसेच धूरफवारणी केली. दरम्यान ऑक्टोबरच्या १७ दिवसांतच डेंग्यूचे ६६ नवे रुग्ण आढळले असून, बाधितांचा एकूण आकडा १,०३८ वर पोहोचला आहे.


पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात डेग्यू, स्वाइन फ्लु, चिकनगुनियासारख्या साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. जूनपासून डेंग्यू आजाराचा उद्रेक पाहायला मिळत आहे. मेमध्ये या आजाराचे तब्बल ३३ नवे रुग्ण आढळले होते. जूनमध्ये डेंग्यूचे १६३ नवे रुग्ण आढळले, तर जुलैमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर या आजाराचे विक्रमी ३०७ रुग्ण आढळले होते. पावसाच्या पाण्याची ठिकठिकाणी साचलेली डबकी या आजाराच्या उद्रेकास कारणीभूत ठरली.


ऑगस्टमध्ये डेंग्यूचे १९८ नवे रुग्ण आढळले, तर सप्टेंबरमध्येही या आजाराची लागण झालेल्या नवीन रुग्णांचा आकडा १९८ इतकाच होता. पावसाळा आता परतीच्या मार्गावर असताना डेग्यूचा उद्रेक मात्र कायम राहिला आहे. २९ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबरदरम्यान डेंग्यूचे ६६ नवे रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे एक जानेवारी ते १४ ऑक्टोबर या कालावधीतील डेंग्यू बाधितांचा एकूण आकडा आता १,०३८ वर पोहोचला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यंदा डेंग्यूचा उद्रेक अधिक पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

ठाण्यात यंदा टेंभीनाक्यावर अनुभवयाला मिळणार थरांचा थरार

ठाणे :  धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहिहंडी उत्सव सुरु करुन साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन

मुंबई-दिघी आणि मुंबई-काशीद रो-रो सेवा मार्चपर्यंत कार्यान्वित करा- मंत्री नितेश राणे

डिझेल परतावा योजनेपासून एकही पात्र मच्छीमार वंचित राहणार नाही मुंबई : मुंबईकरांचा कोकणात जाण्याचा प्रवास सुखकर

Laxman Hake on Manoj Jarange Patil: गणेशोत्सवात मुंबईला जाऊन दंगल घडवायचा जरांगेंचा प्लॅन! लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

पुणे: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा मोर्चा घेऊन धडकणार

'ब्राह्मण पाताळयंत्री', जाधव यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वाद पेटणार?

भास्कर जाधवांचा ब्राह्मण सहाय्यक संघाविरोधात आक्रमक पवित्रा मुंबई: ठाकरे गटाचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर

रक्षाबंधनच्या लॉन्ग विकेंडने एसटीला कमावून दिले १३७ कोटींचे विक्रमी उत्पन्न

मुंबई: यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ८ ते ११ ऑगस्ट या चार दिवसांमध्ये एसटी महामंडळाने

Police Bharti Maharashtra 2025 : ठरलं तर मग, महाराष्ट्रात जम्बो पोलिस भरतीचं बिगुल! १५ हजार पदांसाठी आजच हिरवा कंदील

मुंबई : महाराष्ट्रातील हजारो तरुणांची गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली प्रतीक्षा अखेर संपण्याच्या