Nashik News : पावसाळ्यानंतरही नाशिककरांभोवती डेंग्यूचा विळखा कायम!

  40

बाधितांचा आकडा हजारावर, १७ दिवसांतच ६६ नवे रुग्ण


नाशिक : पावसाळा संपल्यानंतरही डेंग्यूचा (Dengue) प्रकोप कायम असून, सातपूर विभागातील पाच वर्षीय बालकाचा रविवारी डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली. खासगी रुग्णालयाच्या अहवालानुसार, या बालकाला डेंग्यूचे निदान झाले होते. त्यामुळे वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर आला असून, वैद्यकीय विभागाच्या पथकाने या बालकाच्या घरी धाव घेत परिसरात औषध, तसेच धूरफवारणी केली. दरम्यान ऑक्टोबरच्या १७ दिवसांतच डेंग्यूचे ६६ नवे रुग्ण आढळले असून, बाधितांचा एकूण आकडा १,०३८ वर पोहोचला आहे.


पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात डेग्यू, स्वाइन फ्लु, चिकनगुनियासारख्या साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. जूनपासून डेंग्यू आजाराचा उद्रेक पाहायला मिळत आहे. मेमध्ये या आजाराचे तब्बल ३३ नवे रुग्ण आढळले होते. जूनमध्ये डेंग्यूचे १६३ नवे रुग्ण आढळले, तर जुलैमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर या आजाराचे विक्रमी ३०७ रुग्ण आढळले होते. पावसाच्या पाण्याची ठिकठिकाणी साचलेली डबकी या आजाराच्या उद्रेकास कारणीभूत ठरली.


ऑगस्टमध्ये डेंग्यूचे १९८ नवे रुग्ण आढळले, तर सप्टेंबरमध्येही या आजाराची लागण झालेल्या नवीन रुग्णांचा आकडा १९८ इतकाच होता. पावसाळा आता परतीच्या मार्गावर असताना डेग्यूचा उद्रेक मात्र कायम राहिला आहे. २९ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबरदरम्यान डेंग्यूचे ६६ नवे रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे एक जानेवारी ते १४ ऑक्टोबर या कालावधीतील डेंग्यू बाधितांचा एकूण आकडा आता १,०३८ वर पोहोचला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यंदा डेंग्यूचा उद्रेक अधिक पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून

जिओमध्ये गुंतवणूक ही माझ्या आयुष्यातली मोठी रिस्क : मुकेश अंबानी

रिलायन्स आता डीप-टेक, अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनण्याच्या मार्गावर मुंबई  : टेलिकॉम क्षेत्रातील