आक्षी-साखर बंदराचे काम ३ वर्षात होणार पूर्ण!

  41

विकासासाठी राज्य शासनाकडून १५९ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी मंजूर


अलिबाग : अलिबागजवळच्या (Alibaug) आक्षी-साखर मच्छिमारी बंदराचा (Fishing Port) विकास आता दृष्टीक्षेपात आला असून, महाराष्ट्र सागरी मंडळ (मेरिटाईम बोर्ड)च्या माध्यमातून येथे होणाऱ्या बंदराच्या विविध कामांसाठी राज्य शासनाने १५९ कोटी ९९ लाख ७५ हजार ६९२ रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आगामी तीन वर्षात या बंदराचे काम पूर्ण होणार आहे.


आक्षी-साखर हे मच्छिमारी बंदर अलिबाग व आक्षी या दरम्यानच्या आक्षी खाडीकिनारी आहे. गेल्या अनेक वर्षांत या बंदरातील गाळ काढण्यात आला नसल्याने हे बंदर गाळाने भरुन तेथील खोली कमी झाली आहे. परिणामी मोठ्या मच्छिमारी बोटी या बंदरात येण्यात मोठी समस्या निर्माण झाली आहे. मोठ्या मच्छिमार बोटी खोल समुद्रात उभ्या करुन त्यांतील मासे छोट्या बोटीतून बंदरकिनारी आणण्याचा त्रास येथील मच्छिमार बांधवांना आहे. त्यामुळे वेळ व पैसा अशा दोहोंचा अपव्यय होत असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून या बंदरातील गाळ काढून खाडीपात्र खोल करण्याची मागणी होती. ती मागणी पूर्ण होऊ शकणार आहे.


महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई यांनी यासंदर्भांत आक्षी-साखर येथे ग्रोयन्स पद्धतीचा बंधारा, जेट्टी, पोहोच रस्ता बांधणे. नौकानयन मार्गातील गाळ काढणे या कामांचा प्रस्ताव सादर केलेला आहे. आक्षी-साखर बंदराच्या विकासाकरिता ग्रोयन्स पद्धतीचा बंधारा, सुसज्ज जेट्टी, पोहोच रस्ता बांधणे आणि अस्तित्वातील नौकानयन मार्गातील गाळ काढणे या कामांची आवश्यकता असून, त्याकरिता महाराष्ट्र सागरी मंडळाने सन २०२२-२३ मध्ये हे १५१ कोटी ९१ लाखाचे अंदाजपत्रक राज्य शासनाला सादर केले होते. त्याला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता देऊन हा निधी उपलब्ध करून दिला आहे.


आक्षी बंदरात मोठ्या मच्छिमारी बोटी येण्याकरिता येथील गाळ काढण्याच्या कामाबरोबरच समुद्राच्या येणाऱ्या मोठ्या लाटांमुळे एक येथे निर्माण होणारा जलवेग (वॉटर करंट) थांबविण्याकरिता ब्रेकवॉटर वॉलची निर्मीती करण्यात येणार आहे. त्यामुळे खोल समुद्रातून बंदरात येणाऱ्या बोटी विनासायास येऊन बंदरात सुरक्षित उभ्य़ा राहू शकणार आहेत. दरम्यान बंदराच्या बाजुला असलेल्या जमिनीला सुरक्षितता देऊन वाहनांच्या पार्किगची व्यवस्था करण्याकरिता सुरक्षा भिंत (प्रोटेशन बंड) बांधण्यात येणार आहे. आक्षी बंदराचा विकास येत्या तीन वर्षात पूर्ण होणार आहे. या कामांच्या पूर्ततेअंती आक्षी बंदर एक सुसज्ज मच्छिमार बंदर उदयास येणार आहे. त्यामुळे मच्छिमारी व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक