Cabinet Decision : विधानसभेपूर्वी केंद्राचा आणखी एक मोठा निर्णय; मोदींच्या मंत्रिमंडळात अहिल्यानगर नामांतरास मंजुरी

 मुंबई : आता विधानसभेची (Vidhan Sabha Election) आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागू शकते. त्यामुळे महायुती सरकारने त्यापूर्वी जणू निर्णयांचा धूम-धडाका सुरू केल्याचे चित्र दिसत आहे. राज्याची मंत्रिमंडळ बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.१०) पार पडली. विशेष म्हणजे एकाच आठवड्यात ही राज्य मंत्रिमंडाळाची दुसऱ्यांदा घेतलेली (Cabinet Meeting) बैठक आहे. ३३ मोठे निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहेत. केंद्रानं देखील विधानसभेपूर्वी आणखी एक मोठा निर्णय घेत राज्यातील अहमदनगर जिल्‍ह्याचे नाव 'अहिल्‍यानगर' असे नामांतर करण्याची मागणीला मोदींच्या मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत होत असल्याचं पाहायला मिळतंय. तर प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास २ वर्षांचा तुरुंगवास आणि १ लाखाच्या दंडाची तरतूदही आज राज्य मंत्रिमंडाळाच्या बैठकीत करण्यात आली आहे.




नामांतरास पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात मंजुरी


गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्‍ह्याचे नाव 'अहिल्‍यानगर' असे करण्याची मागणी होत होती. यादरम्यान या मागणीच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर अखेर केंद्र सरकारने देखील राज्य सरकारकडून पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे. राज्याचे पशुसंवर्धन, महसूल,आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली. अहिल्यानगर या नावाबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र, केंद्राकडे मंजुरीसाठी हा प्रस्ताव असल्यामुळे अहिल्यानगर होणार का नाही? याबाबत संभ्रम अवस्था असताना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याबद्धल औरंगाबाद हायकोर्टामध्ये अहमदनगरचे नाव बदलू नये, म्हणून याचिका दाखल केली होती. मात्र आता केंद्र सरकारने अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्यास मंजुरी दिल्याने ही चर्चा बंद होणार आहे. दरम्यान राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्विट करत या निर्णयाचे स्वागत करत केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

Comments
Add Comment

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात

आमदार हेमंत पाटील यांनी मांडली 'लव्ह जिहाद' आणि 'लोकसंख्या नियंत्रणाची' आग्रही भूमिका

विधान परिषदेत धर्मांतर विरोधी विधेयकावर चर्चा मुंबई : विधान परिषदेत आज धर्मांतर विरोधी विधेयकावर अत्यंत

धर्मांतर हा श्रद्धेचा विषय, व्यवहाराचा नाही!"; विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकरांची ठाम भूमिका

मुंबई: "धर्म हा केवळ मानवी श्रद्धेचा भाग असून त्याचा व्यवहारासाठी किंवा स्वार्थासाठी वापर करणे चुकीचे आहे.

राज्यातील कालबाह्य ८० कायदे रद्द

विधेयक मंजूर; मुंबई फटक्यांची शिक्षा रद्द करण्याचा अधिनियम रद्द मुंबई : महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले ८०