राज्यात गेल्या तीन वर्षात बालकामगारांची संख्या वाढली

दीपक मोहिते


पालघर : पालघर जिल्ह्यात विविध उद्योगात बालकामगारांची संख्या सतत वाढत आहे. वीटभट्टी, हॉटेल्स, धाबे, किराणा मालाची दुकाने, घरकाम, वाड्या इ. क्षेत्रात सर्रास बालकामगार पाहायला मिळतात. आजच्या घडीला राज्यात सुमारे आठ ते दहा लाखाहून अधिक बालकामगार विविध धोकादायक उद्योगात काम करत आहेत. पण राज्याचे कामगार आयुक्त विभाग, हा वर्षानुवर्षे निद्रावस्थेत आहे. यासंदर्भात या विभागाने कोणतीही ठोस अशी कारवाई केली नाही.


राज्यनिर्मितीला ६५ वर्षे पूर्ण झाली. या काळात अनेक कारखाने व अन्य व्यवसायात बालकामगार हे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी जीव धोक्यात घालून काम करत आहेत.


वास्तविक बालश्रम निर्मूलनासाठी या विभागाने आपले अधिकार व हक्क उद्योजकांकडे गहाण टाकले आहेत. त्यामुळे राज्यात बालकामगारांची संख्या सतत वाढत गेली. बालकामगार बंदी नियमन कायदा १९८६ या कायद्यानुसार १४ वर्षाखालील मुलांना त्यांचे जीवन व आरोग्यास घातक असलेल्या व्यवसायामध्ये कामावर ठेवणे, प्रतिबंधित आहे. मात्र आपल्या राज्यात हा कायदा सरसकट धाब्यावर बसवत अनेक धोकादायक उद्योगात बालकामगार पाहायला मिळतात, वीटभट्टी व्यवसायात तर बालकामगार मोठ्यासंख्येने कामावर असल्याचे दिसून आले आहे. अठराविश्व दारिद्र्य व आर्थिक संकट, या कारणामुळे बालकामगारांचे पालकही आपल्या मुलांच्या जीवाला धोका असल्याचे माहीत असूनही आपल्या मुलांना कामावर पाठवत असतात. लॉकडाऊनमध्ये राज्यातील तमाम शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर अनेक अल्पवयीन मुले पुन्हा शाळेकडे वळली नाहीत व पालकांनी देखील त्यांना शाळेत जाण्याची सक्ती केली नाही. अशावेळी स्थानिक कामगार उपायुक्त कार्यालयाने सर्व्हे करून या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज होती, पण त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही.


राज्यात ५ ते १२ वयोगटातील लाखो मुले लॉकडाऊननंतर शिक्षणापासून वंचित आहेत.वास्तविक कामगार आयुक्त यंत्रणेने या मुलांना हुडकून काढून त्यांना शाळेत पुन्हा दाखल करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.प्रशासनाचे हे वागणे ३ कलम ३९-एफ नुसार बेकायदेशीर असून या मुलांना निरोगी,स्वतंत्र्य व योग्य वातावरणात विकसित होण्याची संधी व सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत. पण तसं होत नसल्यामुळे राज्यात बालकामगारांची संख्या वाढत जाईल, अशी भिती राष्ट्र निर्माण शक्ती, या सामाजिक संस्थेने व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

अक्षय कुमारच्या डीपफेक व्हिडिओवर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, सोशल मीडियावरून व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेश!

मुंबई: आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा पर्याय सर्वांना सहज उपलब्ध असल्यामुळे त्याचा वापर वाढला आहे. त्यात सोशल

'या' महिलांना पोटगी मिळणार नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : घटस्फोट प्रकरणात पोटगी हा महत्वाचा मुद्दा असतो. वैवाहिक भांडणे न्यायालयात सादर झाल्यावर पोटगी वरून

दक्षिण आफ्रिकेचा विजयी चौकार

नवी दिल्ली : महिला विश्वकप स्पर्धेतील १८व्या लीग सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव केला

आयपीएलचा लिलाव पुन्हा परदेशात?

नवी दिल्ली : आयपीएलचा लिलाव पुन्हा एकदा परदेशात होणार आहे. २०२६ च्या हंगामासाठीचा हा लघु-लिलाव १५ ते १८ डिसेंबर

यंदा राज्यात दहा ठिकाणी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने यंदा राज्यात दहा ठिकाणी

‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ विशेष तपासणी अभियानांतर्गत राज्यात ३ हजार ४८५ अन्न आस्थापनांची तपासणी

मुंबई: अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत राज्यात ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ हे विशेष तपासणी