Pune Hit And Run : पोर्शे कार प्रकरणातील धनिकपुत्राला महाविद्यालयात अ‍ॅडमिशन मिळेना!

पुणे : विद्येचे माहेरघर मानले जाणाऱ्या पुणे (Pune) शहरातील कल्याणीनगर परिसरात काही महिन्यांपूर्वी भीषण अपघात (Porsche Car Accident) घडला होता. पुण्यासह राज्यभरात खळबळ उडालेल्या या पोर्शे कार अपघात प्रकरणी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. हिट अँड रन प्रकरणातील पोर्शेचालक अल्पवयीन आरोपी मुलाला शिक्षणासाठी प्रवेश मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. मुलाने केलेल्या कारनाम्यांमुळे दिल्लीमधील एका शैक्षणिक संस्थेने कॉलेजमध्ये प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे या मुलाला शिक्षणात अनेक बाधा येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा बारावी उत्तीर्ण आहे. त्याने दिल्लीमधील एका शैक्षणिक संस्थेत बीबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज केला होता, त्याला याठिकाणी प्रवेशही मिळाला. मात्र, अपघात प्रकरणात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळताच संस्थेने त्याला अॅडमिशन देण्यास नाकारले. या प्रकारानंतर मुलाच्या वकिलांनी याबाबतची तक्रार बाल न्यायमंडळाकडे दिली आहे. मुलाच्या शिक्षणात कोणतीही बाधा येऊ नये, अशी भूमिका अल्पवयीन आरोपी मुलाच्या वकिलांनी घेतली आहे.


दरम्यान, या अल्पवयीन आरोपी मुलाला प्रौढ घोषित करण्याच्या अर्जावर ४ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. मुलाला प्रौढ ठरविण्याबाबत पोलिसांनी बाल न्याय मंडळात (जेबीबी) अर्ज दाखल केलेला आहे.त्यावर अद्याप निकाल झालेला नाही. त्या अर्जावर पुढील सुनावणी चार ऑक्टोबरला होणार आहे.

Comments
Add Comment

पेपर सुरु असताना विद्यार्थिंनीसोबत घडला लाजिरवाणा प्रकार, नेमकं घडलं काय?

नाशिक: नाशिकमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. १३ मार्च रोजी दहावीचा पेपर सुरू असताना एका

सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी; पोलिसांनी केलं आवाहन

संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहा

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील