काँग्रेस, तुतारी समोर कितीही नाक रगडले तरी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद मिळणार नाही

उबाठाची ‘ना घर का ना घाट का’ अशी अवस्था आमदार नितेश राणे यांचा घणाघात



  • महाविकास आघाडीत उबाठा सेना हा सावत्र भाऊ

  • खुर्ची सोडा स्टूलवर बसण्याची आली आहे वेळ

  • लोकसभा निवडणुकीत उबाठाचा स्ट्राइक रेट सर्वात खराब होता


कणकवली : महाविकास आघाडीत उबाठा सेना हा सावत्र भाऊ झाला आहे. त्यामुळे उबाठाची ‘ना घर का ना घाट का’ अशी अवस्था झाली आहे. दिल्लीत मुजरा करून सुद्धा मुख्यमंत्री पदाची चॉकलेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना कोणच देत नाही. कितीही हाणा पण मला वाघ म्हणा अशी उद्धव ठाकरे यांची अवस्था झालेली आहे. काँग्रेस आणि तुतारी समोर कितीही नाक रगडले तरी उद्धव ठाकरेंना या जन्मात तरी मुख्यमंत्री पद मिळणार नाही. असा घणाघाती टोला भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर देताना केली.


कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत आणि उबाठा सेनेवर टीका केली. ते म्हणाले, काँग्रेस समोर किती छाती फुगवली तरी महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेस आणि तुतारीवाले उबाठाला चहा पण विचारत नाहीत. बसायला खुर्ची सोडा स्टूल वर बसण्याची वेळ उबाठावर आलेली आहे. त्यामुळे लायकी एवढेच तोंड उघडल्यास काँग्रेस उबाठाला सीटचे काही तुकडे देतील. कारण लोकसभा निवडणुकीत उबाठा स्ट्राइक रेट सर्वात खराब आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी लायकीत राहावं असाही सल्ला यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर टीका करताना गुजरात वर घसरणाऱ्या संजय राऊतला त्याचे मालक आणि मालकीण गुजरातला जातात, गुजरातींच्या लग्नात हजेरी लावतात. त्यांची ताटे उचलतात. नाच्याप्रमाणे मालकाचा मुलगा नाचतो हे माहीत आहे मात्र संजय राऊतला सोबत नेत नाहीत त्याची ओळख करून देत नाही. म्हणून संजय राऊत जळतो त्याला हे खटकते आणि त्यामुळे गुजरात्यांवर संजय राऊत टीका करत असल्याची ही मिश्किल टिका यावेळी आमदार नितेश राणे यांनी केली.

Comments
Add Comment

पुण्यात पसरला विषारी धूर, ५ विद्यार्थी रुग्णालयात; २० हजार विद्यार्थ्यांच्या कॉलेजला सुट्टी, एक कंपनी बंद

पुणे : पुण्यात लोणी काळभोर परिसरात मुळा-मुठा नदीपात्रात निमयित मोठ्या प्रमाणात कचरा टाकून तो जाळला जात आहे. या

Nagpur Blast : नागपूर कारखाना स्फोट; पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

नागपूर येथील कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला, आणि

Holi 2026 : रंग-पिचकाऱ्यांच्या किंमतीत सरासरी पाच टक्के वाढ, तरीही खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा रंगांनी न्हाऊन निघाल्या आहेत.

Pune: धक्कादायक! पुण्यात महिलेची गर्भाशयाची गाठ काढण्याऐवजी डॉक्टरांनी...

पुणे: पुण्यातील मांजरी परिसरातील एका खासगी रुग्णालयातून वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

Nagpur Blast : काटोलमध्ये स्फोटक कारखान्यात भीषण दुर्घटना; १२ ठार, १५ जखमी

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या SBL कंपनीत १ मार्च रविवारी सकाळी सुमारे ७

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या