Kedarnath Landslide : केदारनाथमध्ये भूस्खलन! ५ जणांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची शक्यता

उत्तराखंड : उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कालम सायंकाळी केदारनाथमध्ये भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत काही भाविकांचा मृत्यू झाला असून अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, केदारनाथमध्ये सोनप्रयाग आणि गौरीकुंड दरम्यान मुनकटियाजवळ सोमवारी सायंकाळी उशिरा भूस्खलनाची घटना घडली. भूस्खलनाची माहिती मिळताच पोलीस, राज्य आपत्ती आणि राष्ट्रीय आपत्ती दलाचे पथक दाखल झाले. पथकाकडून तातडीने बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले. परंतु खराब हवामान, बर्फवृष्टी आणि सतत दगड, मातीचे ढिगारे पडत असल्यामुळे बचावकार्य थांबवण्यात आले होते. मात्र आज सकाळी पुन्हा बचावकार्य सुरू केले असता पाच मृतदेह तर तीन जखमींना बाहेर काढण्यात आले.



जखमींची माहिती


पाच मृत व्यक्ती या मध्य प्रदेशातील घाट जिल्ह्यातील नेपावाली येथील राहणारे असल्याची ओळख पटली आहे. हे मृत व्यक्ती केदारनाथ धाममध्ये दर्शनासाठी पोहोचले होते. मात्र सोमवारी झालेल्या भूस्खलनात ते अडकले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचसोबत भुस्खलनात सापडलेल्या तीन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


दरम्यान, दरड कोसळल्यानंतर बंद झालेला रस्ता काही वेळाने प्रवाशांना चालण्यासाठी खुला करण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे. सध्या राज्य आपत्ती आणि राष्ट्रीय आपत्ती दलाचे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

Comments
Add Comment

Google Gemini Nano Banana AI trend : मुलींनो सावधान! गुगल जेमिनाय’मध्ये फोटो करताय? IPS अधिकाऱ्याने दिला धक्कादायक इशारा, नक्की वाचा

‘गुगल जेमिनाय’च्या (Google Gemini) नॅनो बनाना एआय फीचरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. असंख्य नेटकरी आपले फोटो

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा