Ganeshotsav : गणेशोत्सवासाठी विविध साहित्यांनी सजली बाजारपेठ

तळा : महाराष्ट्राच्या लाडक्या बाप्पाचे आगमन यंदा लवकरच असल्याने गणेशोत्सवात लागणाऱ्या विविध साहित्यांनी तळा बाजारपेठ सजली आहे. मुंबईकर पाच दिवस आधीच कोकणात पोहोचतात. बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु होते. या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजल्या असून आता इथे खरेदीसाठी लोकांची गर्दी दिसून येत आहे.


गणेशोत्सवासाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असल्याने रोजगारासाठी शहराकडे स्थलांतरित झालेले मुंबईकर चाकरमानी गणेशोत्सवासाठी आपल्या गावी परतू लागले आहेत. चाकरमानी चार दिवस आधीच गावी येऊन गावातील घराची साफसफाई करून घरामध्ये गणेशोत्सवासाठी लागणारे साहित्य भरून ठेवतात.तळा हे तालुक्याचं ठिकाण असल्याने आजूबाजूला वसलेले खेड्यातील अनेक नागरिक खरेदीसाठी शहरात येत असतात.तसेच फळे, पालेभाज्या,व इतर जीवनावश्यक वस्तू माफक दरात मिळत असल्याने खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.


गणरायाच्या पूजेसाठी लागणारे धुप, कापुर, अगरबत्ती, गळ्यातील कंठीहार,सजावटीसाठी लागणारे कृत्रिम फुलांच्या माळा तसेच विविध साहित्यांनी तळा बाजारपेठ सजली आहे.यावर्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अनुदान महिलांच्या खात्यात जमा झाल्याने बाजारात खरेदीसाठी महिला वर्गाची देखील लगबग पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी