भिवंडीत डिझेल विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा जणांना टँकर व १५ हजार लिटर डिझेलसह घेतले ताब्यात

भिवंडी : भिवंडी शहरात टँकर घेऊन डिझेल विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघा जणांना शांतीनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्या जवळून टँकर व १५ हजार लिटर डिझेल असा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.


भिवंडी कल्याण रस्त्यावरील साईबाबा मंदिर हिना गॅरेज समोरील रस्त्यावर दोन व्यक्ती अवैध डिझेलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त बातमी शांतिनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे यांना मिळाल्यानंतर त्यांच्या पथकातील पोलीस पथकाने घटनास्थळी सापळा रचून अजित चोविसलाल यादव, वय ३४ रा.बेलापूर नवी मुंबई,व चालक आरीफ जलालुदीन खान, वय ४२ रा. मानखुर्द, मुंबई यांना ताब्यात घेतले.


त्यांच्या जवळ टँकर मधील डिझेल बाबत कोणतीही कागदपत्रे आढळून न आल्याने त्यांनी हे डिझेल विक्रीसाठी घेऊन आल्याचे निष्पन्न झाल्याने शांतीनगर पोलिसांनी १० लाख ८० हजार रुपये किमतीचे १५ हजार ५०० लिटर डिझेल व १० लाख रुपयांचा टँकर असा एकूण २० लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याी माहिती विनायक गायकवाड यांनी दिली.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मार्गावरील कोलमडलेल्या वेळापत्रकाची चौकशी करून ठोस उपाययोजना करा

एसएमएस प्रणाली अद्ययावत करून प्रवाशांना सुखकर प्रवासाची योग्य सेवा, सुविधा द्या खासदार नरेश म्हस्के यांचे

ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले

ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून

Udddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डोंबिवलीत मोठा धक्का! विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'धनुष्यबाण'

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे

पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली

मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापौर सक्रिय

भाईंदर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या, त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास तसेच