दहीहंडी आणि गणेशोत्सवासाठी आलेले मंडप परवानगी अर्ज विनाविलंब मंजूर करावे!

अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांचे निर्देश


ठाणे : महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गणेशोत्सव तयारीबाबत केलेल्या सूचनांनुसार करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा अतिरिक्त आयुक्त रोडे यांनी घेतला. या बैठकीत ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दहीहंडी उत्सव (Dahihandi) आणि गणेशोत्सवसाठी (Ganeshotsav) ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने आलेले मंडप परवानगीचे अर्ज सहायक आयुक्तांनी विनाविलंब मंजूर करावेत, असे निर्देश दिले आहेत.


सध्या दहीहंडीच्या मंडपासाठी ५१ तर गणेशोत्सवाच्या मंडपांसाठी १५७ अर्ज आले असून त्यांच्या परवानगीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या मंडळांकडून परवानगीसाठी आलेले अर्ज सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन दल यांच्याकडील आवश्यक परवानगी, ना हरकत दाखला घेवून प्रभाग समिती स्तरावर तत्काळ मार्गी लावावेत. किती परवानगी देण्यात आली, त्यात काही विलंब होत नाही ना याचा सहायक आयुक्त आणि परिमंडळ आयुक्त यांनी दैनंदिन स्वरूपात आढावा घ्यावा, असे अतिरिक्त आयुक्त रोडे यांनी सांगितले.


त्याचबरोबर, विसर्जन घाट आणि परिसर तेथील व्यवस्था यांचीही माहिती या बैठकीत देण्यात आली. मंडळांनीही आवश्यक त्या सर्व परवानगी वेळेत घ्याव्यात. त्यापैकी मंडप परवानगी ही मंडळांच्या दर्शनी भागात लावावी. तसेच, वाहतुकीला कोणताही अडथळा होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून त्यास मंडळांनी सक्रिय साथ द्यावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी यानिमित्ताने केले आहे.



महापालिकेच्या आरास स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन


ठाणे महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी दरवर्षी महापालिका आरास स्पर्धेचे आयोजन करते. त्यात एकूण आठ पारितोषिके दिली जातात. प्रथम क्रमांकास १० हजार, द्वितिय क्रमांकास ७५०० आणि तृतीय क्रमांकास ६५०० रुपये असे पारितोषिक असते. स्पर्धेतील सहभागासाठी ०२ सप्टेंबरपर्यंत मंडळांना माहिती व जनसंपर्क विभागाच्या कार्यालयात अर्ज सादर करता येतील. या स्पर्धेचे परीक्षण त्रयस्थ परीक्षकांमार्फत केले जाते. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही अतिरिक्त आयुक्त रोडे यांनी केले आहे.

Comments
Add Comment

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला