भारतात वर्षभरात ७.३ कोटी नव्या इंटरनेट ग्राहकांची भर

नवी दिल्ली : भारतात गेल्या वर्षभरात ७.३ कोटी नव्या इंटरनेट ग्राहकांची भर पडली आहे. देशात मार्च २०२३ मध्ये ८८.१ कोटी इंटरनेट ग्राहक होते. तर मार्च २०२४ मध्ये ही संख्या ९५.४ कोटी झाली. गेल्या एका वर्षात तब्बल ८.३० टक्के इंटरनेट ग्राहक वाढले आहे. भारतीय दूरसंचार नियमक प्राधिकरणाच्या (ट्राय ) वार्षिक अहवालात ही माहिती पुढे आली आहे.


या अहवालात विविध सेवांमधील लक्षणीय वाढीचा कल आणि प्रमुख मापदंड अधोरेखित करण्यात आले आहेत. भारतात दूरध्वनी जोडण्यांचे एकूण प्रमाण मार्च २०२३ च्या अखेरीस ८४.५१ टक्के होते ते मार्च २०२४ अखेरपर्यंत १.३९ टक्क्यांच्या वार्षिक दराने ८५.६९ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे या अहवालात दिसून आले आहे. यासोबतच ब्रॉडबँड सेवांनी त्यांचा चढता कल कायम राखला आहे, ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या मार्च २०२३ मधील ८४.६ कोटींवरून मार्च २०२४ मध्ये ९२.४ कोटीपर्यंत वाढली असून हा मजबूत वाढीचा दर ९.१५ टक्के आहे. देशातील दूरध्वनी ग्राहकांची संख्या मार्च २०२३ अखेर ११७.२ कोटी होती ती मार्च २०२४ अखेरीस ११९.९ कोटीपर्यंत वाढली, हा वार्षिक वाढीचा दर २.३० टक्के इतका आहे. दरमहा प्रति ग्राहक सरासरी मिनिटे वापर हा २०२२- २३ या वर्षातील ९१९ वरून २०२३- २४ मध्ये ९६३ पर्यंत वाढला आणि हा वाढीचा दर ४.७३ टक्के आहे. यासोबतच समायोजित सकल महसूल देखील २०२२-२३ मधील २,४९,९०८ कोटी रुपयांवरून २०२३- २४ मध्ये २,७०,५०४ कोटी रुपयांपर्यंत वाढला असून हा वाढीचा दर ८.२४ टक्के आहे.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.