भारतात वर्षभरात ७.३ कोटी नव्या इंटरनेट ग्राहकांची भर

नवी दिल्ली : भारतात गेल्या वर्षभरात ७.३ कोटी नव्या इंटरनेट ग्राहकांची भर पडली आहे. देशात मार्च २०२३ मध्ये ८८.१ कोटी इंटरनेट ग्राहक होते. तर मार्च २०२४ मध्ये ही संख्या ९५.४ कोटी झाली. गेल्या एका वर्षात तब्बल ८.३० टक्के इंटरनेट ग्राहक वाढले आहे. भारतीय दूरसंचार नियमक प्राधिकरणाच्या (ट्राय ) वार्षिक अहवालात ही माहिती पुढे आली आहे.


या अहवालात विविध सेवांमधील लक्षणीय वाढीचा कल आणि प्रमुख मापदंड अधोरेखित करण्यात आले आहेत. भारतात दूरध्वनी जोडण्यांचे एकूण प्रमाण मार्च २०२३ च्या अखेरीस ८४.५१ टक्के होते ते मार्च २०२४ अखेरपर्यंत १.३९ टक्क्यांच्या वार्षिक दराने ८५.६९ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे या अहवालात दिसून आले आहे. यासोबतच ब्रॉडबँड सेवांनी त्यांचा चढता कल कायम राखला आहे, ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या मार्च २०२३ मधील ८४.६ कोटींवरून मार्च २०२४ मध्ये ९२.४ कोटीपर्यंत वाढली असून हा मजबूत वाढीचा दर ९.१५ टक्के आहे. देशातील दूरध्वनी ग्राहकांची संख्या मार्च २०२३ अखेर ११७.२ कोटी होती ती मार्च २०२४ अखेरीस ११९.९ कोटीपर्यंत वाढली, हा वार्षिक वाढीचा दर २.३० टक्के इतका आहे. दरमहा प्रति ग्राहक सरासरी मिनिटे वापर हा २०२२- २३ या वर्षातील ९१९ वरून २०२३- २४ मध्ये ९६३ पर्यंत वाढला आणि हा वाढीचा दर ४.७३ टक्के आहे. यासोबतच समायोजित सकल महसूल देखील २०२२-२३ मधील २,४९,९०८ कोटी रुपयांवरून २०२३- २४ मध्ये २,७०,५०४ कोटी रुपयांपर्यंत वाढला असून हा वाढीचा दर ८.२४ टक्के आहे.

Comments
Add Comment

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन