किल्ला सुरक्षेसाठी आंदोलनाला बसलेल्या गडप्रेमींना पोलिसांची नोटीस

  183

भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील ऐतिहासिक घोडबंदर किल्यावर सुरक्षा रक्षक नसल्यामुळे वाढलेल्या असामाजिक लोकांच्या वावरामुळे किल्ल्याचे पावित्र्य धोक्यात आले आहे. यासाठी आंदोलनाला बसलेल्या गडप्रेमींना पोलिसांनी नोटीस बजावल्याने अनेक सामाजिक संस्था, राजकीय नेते, पत्रकार यांनी गडप्रेमींना पाठिंबा दर्शवत आंदोलनाच्या ठिकाणी एकच गर्दी केली आहे.


मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात असलेला घोडबंदर किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेला किल्ला असल्याची नोंद इतिहासात आहे. पुरातत्व विभागाने सुरक्षा आणि संवर्धन करण्यासाठी हा किल्ला महापालिकेकडे सोपवला आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेला हा किल्ला महापालिकाकडे आल्यावर प्रशासनाने त्याची सुरक्षा देखभाल करण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात करणे तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक होते. परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे किल्ल्यावर असामाजिक लोकांचा वावर वाढला आहे.


किल्ल्यावर मद्यपानाच्या बाटल्या, नशेच्या बाटल्यांचा खच पडू लागला आहे. त्यामुळे किल्ला जतन समितीच्या वतीने रोहित सुवर्णा आणि समिती सदस्यांनी महापालिका आयुक्त संजय काटकर यांची भेट घेऊन त्यांना किल्यावर सुरक्षा रक्षक नेमणे आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबतचे निवेदन दिले होते. परंतु गड- प्रेमींची मागणी पुर्ण करण्यास आयुक्तांनी असमर्थता दर्शविली. त्यामुळे गडप्रेमींनी सोमवारपासून भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते.


मंगळवारी सकाळी भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६८ प्रमाणे गडप्रेमी आंदोलकांना नोटीस बजावली आहे. सदर बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि गडप्रेमींना पाठिंबा दर्शविण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, राजकीय नेते, पत्रकार यांनी आंदोलनाच्या ठिकाणी एकच गर्दी केली आहे.

Comments
Add Comment

नदी, नाल्यांकडे दुर्लक्ष, नालेसफाईत कोट्यावधी खर्च

कांदिवली (वार्ताहर) : कांदिवली, चारकोप आणि बोरिवली गोराईतील खाडीकिनारी असलेली खारफुटी नामशेष होत असून, तिथे

विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष

Success Mantra: सकाळी उठताच लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनात येणार नाही अडथळे

मुंबई: आचार्य चाणक्य हे भारताचे थोर विचारवंत होते. त्यांनी आपले अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर चाणक्य नितीमध्ये

Mohammad Shami: कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोहम्मद शमीला मोठा झटका

नवी दिल्ली: कोलकाता उच्च न्यायालयाकडून क्रिकेटर मोहम्मद शमीला मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने शमीला त्याची

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

टाकीचा स्लॅब कोसळून चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

आमदार निकोलेंच्या प्रश्नावर पाणीपुरवठा मंत्र्यांची कारवाई पालघर : डहाणू तालुक्यातील गट ग्रामपंचायत चळणी