बुद्ध विहाराचे बांधकाम अर्धवट ठेवून ठेकेदार फरार, मागील वर्षभरापासून काम अपूर्णच

  60

मोनिश गायकवाड


भिवंडी : भिवंडी तालुक्यातील शेलार ग्रामपंचायत हद्दीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मधील गंधकुटी बुद्ध विहाराचे काम भिवंडी पश्चिमचे भाजपाचे आमदार महेश चौगुले यांच्या स्थानिक विकास निधीतून भूमिपूजन करून जवळपास दीड वर्ष झाला. परंतु ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम आजपर्यंत झाले नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.


दहा लाख रुपयांचा निधी या बुद्ध विहाराच्या बांधकामाकरिता मंजूर केला असून ठेकेदाराने मागील वर्षभरात फक्त पायाचे बांधकाम केले असून उर्वरित बांधकाम मागील वर्षभरापासून तसेच अर्धवट ठेवले असून दहा लाख रुपयांचा निधी ठेकेदाराने अर्धवट काम ठेवून फरार झाला आहे.


अनेकदा मागणी करून देखील ठेकेदार काम करीत नसल्याने स्थानिक भीम अनुयायांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. भिवंडी पश्चिम चे आमदार महेश चौगुले यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करून दुसरा ठेकेदाराकडून हे काम पूर्ण करावे अशी मागणी मोनीश गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Comments
Add Comment

नोकरीच्या शोधात आहात? तर ही बातमी आहे तुमच्यासाठी

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती, ८,७६७ पदांना मान्यता मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७

Crizac Limited IPO: उद्यापासून Crizac आयपीओ बाजारात दाखल होणार Price Band २३३ ते २४५ रूपये निश्चित!

प्रतिनिधी: उद्यापासून क्रिझॅक लिमिटेड (Crizac Limited) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात दाखल होत आहे. ८६० कोटींचा

महाराष्ट्रात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र