बुद्ध विहाराचे बांधकाम अर्धवट ठेवून ठेकेदार फरार, मागील वर्षभरापासून काम अपूर्णच

मोनिश गायकवाड


भिवंडी : भिवंडी तालुक्यातील शेलार ग्रामपंचायत हद्दीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मधील गंधकुटी बुद्ध विहाराचे काम भिवंडी पश्चिमचे भाजपाचे आमदार महेश चौगुले यांच्या स्थानिक विकास निधीतून भूमिपूजन करून जवळपास दीड वर्ष झाला. परंतु ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम आजपर्यंत झाले नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.


दहा लाख रुपयांचा निधी या बुद्ध विहाराच्या बांधकामाकरिता मंजूर केला असून ठेकेदाराने मागील वर्षभरात फक्त पायाचे बांधकाम केले असून उर्वरित बांधकाम मागील वर्षभरापासून तसेच अर्धवट ठेवले असून दहा लाख रुपयांचा निधी ठेकेदाराने अर्धवट काम ठेवून फरार झाला आहे.


अनेकदा मागणी करून देखील ठेकेदार काम करीत नसल्याने स्थानिक भीम अनुयायांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. भिवंडी पश्चिम चे आमदार महेश चौगुले यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करून दुसरा ठेकेदाराकडून हे काम पूर्ण करावे अशी मागणी मोनीश गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Comments
Add Comment

Google's doodle : गुगलचं विशेष ‘पाय डे’ डूडल; गणितातील प्रसिद्ध स्थिरांकाला गुगलकडून अनोखा सलाम

मुंबई : गुगलने जगभरातील गणितप्रेमींसाठी १४ मार्च २०२६ रोजी खास डूडल सादर करून ‘पाय डे’ साजरा केला. या विशेष

आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेत खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढवा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

मुंबई : मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री

Operation White Hammer : आंध्र प्रदेशात ४७ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)

धामणगाव गढी परिसरात चक्क अस्वलाचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव गढी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Dhurandhar : रि-रिलीजच्या सिरीजमध्ये रणवीरच्या धुरंधरची एन्ट्री; या दिवशी होणार रिलीज

रणवीर सिंहच्या धुरंधर चित्रपटाची अजूनही फॅन्समध्ये जबरदस्त क्रेझ असून लवकरच धुरंधर 2 प्रेक्षकांच्या भेटीला

युद्धामुळे अडकलेली लारा दत्ता मुलीसह भारतात परतली; सांगितला थरारक अनुभव

मुंबई : मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकले आहेत त्या काळात लारा