Manoj Jarange Patil : नाशकात आज मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीची सांगता!

अनेक रस्ते बंद, शाळांनाही सुट्टी; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन


नाशिक : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळवून देण्यासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आज नाशिक शहरात शांतता रॅली (Shantata Rally) निघणार आहे. पुणे आणि अहमदनगरनंतर आज ही फेरी नाशिकमध्ये (Nashik) दाखल होणार आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणानंतर नाशिकमध्येच रॅलीची सांगता होणार आहे. त्यामुळे या रॅलीत मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पोलीस देखील तैनात करण्यात आले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील तपोवन जुना आडगाव नाका - निमाणी मालेगाव स्टॅण्डमार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत होणार आहे. त्यानंतर सीबीएस येथील चौकात रॅलीमध्ये सहभागी झालेल्या उपस्थित सकल मराठा समाज बांधवांना मनोज जरांगे पाटील संबोधित करतील व शांतता रॅलीचा समारोप होणार आहे. यादरम्यान प्रशासनाने शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच वाहनचालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.



कोणते मार्ग बंद?


स्वामी नारायण चौकापासून ते कन्नमवार पूल, मिर्ची सिग्नल ते स्वामी नारायण चौक, संतोष टी पॉइंट ते दिंडोरी नाका, मालेगाव स्टँड, रविवार कारंजा ते सांगली बँक सिग्नल, मेहेर सिग्नल ते सीबीएसच्या दोन्ही बाजूकडील रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असणार आहे.



काय आहे पर्यायी मार्ग?


छत्रपती संभाजीनगरकडून येणारी वाहतूक मिरची हॉटेल सिग्नल येथून अमृतधाम, तारवाला चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती सिग्नल, पेठरोडमार्गे मार्गस्थ करण्यात येईल. धुळेकडून येणारी वाहतूक अमृतधाममार्गे तारवाला चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पेठरोडमार्गे मार्गस्थ होईल. दिंडोरी नाक्याकडून येणारी वाहतूक पेठनाका, मखमलाबाद नाका, रामवाडी पुलामार्गे वळवण्यात येणार आहे. दिंडोरी नाक्याकडून जाणारी वाहतूक तारवाला चौक, हिरावाडीकडून मार्गस्थ तर द्वारका सर्कलकडून कन्नमवार पुलाकडे पुलाखालून जाणारी वाहतूक द्वारका उड्डाणपुलावरून मार्गस्थ होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये