CM Eknath Shinde : केशवराव नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीसाठी मुख्यमंत्र्यांची मदत; १० कोटींचा निधी मंजूर!

  59

कोल्हापूर : कोल्हापुरात (Kolhapur) काल रात्री साडेआठच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. कोल्हापूरचा सांस्कृतिक वारसा आणि राजर्षी शाहू महाराज यांची आठवण जपणारे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला (Keshavrao Bhosale Natyagruha Fire) भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण नाट्यगृहासह खासबाग मैदानाला देखील मोठा फटका बसला. हे नाट्यगृह जळून खाक झाल्यामुळे नाट्यसृष्टीतून प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushriff) यांनी हे नाट्यगृह पुन्हा नव्याने उभारणार असल्याचे आश्वासन दिले आहे. हसन मुश्रीफ यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील नाट्यगृह पुर्नबांधणीच्या मदतीसाठी सरसावले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, केशवराव नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीसाठी आता राज्य सरकारकडूनही प्रयत्न केले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळावरील परिस्थिती तसेच वस्तुस्थितीचा आढावा घेतला. त्यानुसार नाट्यगृहाचे अंदाजे ५० कोटींचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे केशवराव नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीसाठी एकनाथ शिंदे यांनी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

Comments
Add Comment

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही