टोमॅटोच्या महागाईचा परिणाम, जुलैमध्ये ११ टक्क्यांनी महागली व्हेज थाळी

मुंबई: जुलै महिन्यात व्हेज भोजन करणाऱ्यांवर महागाईचा परिणाम झाला आहे. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात शाकाहारी भोजनाची थाळी ११ टक्क्यांनी महाग झाली. या वाढीमागे सगळ्यात मोठे योगदान टोमॅटोच्या वाढत्या किंमतीचे होते.जुलै महिन्यात जून महिन्याच्या तुलनेत नॉन व्हेज थाळीमध्येही ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.



टोमॅटोचे दर वाढल्याने व्हेज थाळी महागली


क्रिसिल मार्केट इंटेलिजेन्स अँड अॅनालिसिसने जुलै २०२४साठी आपल्या रोटी राईस रेट इंडेक्सच्या रिपोर्टमध्ये सांगितले की व्हेज थाळी जुलै महिन्यात ३२.६ रूपयांची झाली. जूनमध्ये हा दर २९.४ रूपये प्रति प्लेट इतका होता. व्हेज थाळीची सरासरी किंमत ११ टक्क्यांनी वाढली आहे.


व्हेज थाळीमध्ये भाज्यांमध्ये कांदा, टोमॅटो आणि बटाटाशिवाय भात, डाळ, दही आणि सलाडचा समावेश केला जातो. टोमॅटोच्या किंमती वाढल्याने व्हेज थाळी महागली. व्हेज थाळी महाग होण्यामध्ये ७ टक्के योगदान हे केवळ टोमॅटोच्या किंमतीमुळे झाले.



नॉनव्हेज थाळीही महागली


क्रिसिल रिपोर्टनुसार जुलै महिन्यात नॉन व्हेज थाळीही महागली. नॉन व्हेज थाळीच्या किंमतीत ६ टक्क्यांची वाढ झाली.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च