बिहारच्या हाजीपूरमध्ये दुर्देवी घटना, विजेचा करंट लागून ८ कावड यात्रेकरूंचा मृत्यू

पाटणा: बिहारच्या हाजीपूर येथे करंट लागल्याने ९ कावड यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. यात एक अल्पवयीनाचा समावेश आहे. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली. ११ हजार वोल्टच्या तारेचा स्पर्श डीजेला झाला. आग लागताच डीजे ट्रॉली जळाली. ही संपूर्ण घटना हाजीपूरच्या औद्योगिक ठाणे क्षेत्रातील सुल्तानपूर येथे घडली. घटनास्थळी जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस, अॅम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेडची टीम पोहोचली.


घटनेसंबंधित समोर आलेल्या माहितीनुसार हे सर्व कावड यात्रेकरू पहलेजा घाटातून गंगाजल घेऊन बाबा हरिहरनाथ मंदिरात जाणार होते. श्रावण महि



हरिहरनाथ मंदिरात जाऊन कऱणार होते जलाभिषेक


न्यातील तिसऱ्या सोमवारी जलाभिषेक करणार होते. दरम्यान, रस्त्यातच ही घटना घडली. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हे लोक निघणारच होते. त्याचवेळेस ११ हजार वोल्ट तारेचा स्पर्श डीजेला झाला. या घटनेत अनेक जण जखमीही झाले. जखमी झालेल्यांना हाजीपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व मृत व्यक्तींची ओळख पटवण्यात आली आहे.


या घटनेतील सर्व मृत व्यक्ती हाजीपूर औद्योगिक ठाणे क्षेत्रातील सुल्तानपूर गावात राहणारे होते. सुल्तानपूर गावातून डीजे ट्रॉली घेऊन कावड यात्रेकरूंचा ग्रुप निघाला होता. या घटनेनंतर गावात संपूर्ण शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे

Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने

Rajnath Singh : "पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर..."; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार