बिहारच्या हाजीपूरमध्ये दुर्देवी घटना, विजेचा करंट लागून ८ कावड यात्रेकरूंचा मृत्यू

पाटणा: बिहारच्या हाजीपूर येथे करंट लागल्याने ९ कावड यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. यात एक अल्पवयीनाचा समावेश आहे. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली. ११ हजार वोल्टच्या तारेचा स्पर्श डीजेला झाला. आग लागताच डीजे ट्रॉली जळाली. ही संपूर्ण घटना हाजीपूरच्या औद्योगिक ठाणे क्षेत्रातील सुल्तानपूर येथे घडली. घटनास्थळी जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस, अॅम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेडची टीम पोहोचली.


घटनेसंबंधित समोर आलेल्या माहितीनुसार हे सर्व कावड यात्रेकरू पहलेजा घाटातून गंगाजल घेऊन बाबा हरिहरनाथ मंदिरात जाणार होते. श्रावण महि



हरिहरनाथ मंदिरात जाऊन कऱणार होते जलाभिषेक


न्यातील तिसऱ्या सोमवारी जलाभिषेक करणार होते. दरम्यान, रस्त्यातच ही घटना घडली. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हे लोक निघणारच होते. त्याचवेळेस ११ हजार वोल्ट तारेचा स्पर्श डीजेला झाला. या घटनेत अनेक जण जखमीही झाले. जखमी झालेल्यांना हाजीपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व मृत व्यक्तींची ओळख पटवण्यात आली आहे.


या घटनेतील सर्व मृत व्यक्ती हाजीपूर औद्योगिक ठाणे क्षेत्रातील सुल्तानपूर गावात राहणारे होते. सुल्तानपूर गावातून डीजे ट्रॉली घेऊन कावड यात्रेकरूंचा ग्रुप निघाला होता. या घटनेनंतर गावात संपूर्ण शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

देशभरात पुढील आठवड्यापासून मतदार याद्यांची सखोल छाननी

पुढील वर्षी पश्चिम बंगालसह ५ राज्यांत निवडणुका निवडणूक आयोग पुढील आठवड्यात देशभरातील मतदार याद्यांचे विशेष

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

अरे बापरे! देशभरात २२ बनावट विद्यापीठे

यूजीसीकडून देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देशातील २२ बनावट

फक्त ६ वर्षांच्या मुलांनाच पहिलीत प्रवेश

दिल्ली सरकारने पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा केली निश्चित नवी दिल्ली  : दिल्ली सरकारने शालेय शिक्षणात एक

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या  : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे पुढील सरन्यायाधीश! चार दशकांहून अधिक अनुभव असणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या कार्याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

नवी दिल्ली: देशाचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरन्यायाधीश हा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही